Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१०

Sri Kaka Bhujanda Maharishi, Ramani Guruji, Narbhavee, Ashram location

Sri Kaka Bhujanda Maharishi, Ramani Guruji, Narbhavee, Ashram location: "Swagatham Swagatham Swagatham Vesudehva Family. Om Shakthi Om Shakthi Om Shakthi Om Narbhavee Narbhavee Narbhavee OM Swagatham Swagatham Swagatham Vesudheva family Om Shakthi Om Shakthi.

For Europe please check: http://narbhavie.com/


The Ashram is located in the outskirts of Chennai, Tamilnadu in India.
The exact address is
18 Alamelupuram, Selaiyur, E. Tambaram, Chennai 600 072

Timings:
The readings take place in the mornings and evenings. The readings as mentioned before are divine readings and take place only when Maharishi gives the “approval” to Guruji.
One needs to be there before 8:00 AM in the morning and by 6:00 PM in the evenings.

What to bring:
The custom and traditions of India, one take fruits and flowers when seeing a spiritual master

What does it cost?
This is a divine reading – not only one cannot assess or give a value for the guidance, there is no cost for the readings, should one be destined to receive/hear the reading.

Travel:
Guruji does travel frequently and it would be better to call and check with HIM to see if HE is in town.

Contact when Guruji is in Chennai:

Country Code: 91

City Code: 44

Telephone number: 22290595

Website : http://www.arulvanam.org/Contact%20us.html

How to reach Sri Ramani Guruiji - Kagabujanda Jeeva Naadi Reader / Discourser


As many may not know how to reach Sri Ramani Guruji - Reader of SriKagabujandar Jeeva Nadi - a free service.Kindly drive down Valachery - Tambaram Road -> take left/rightaccording to your direction of travel into the road called Camp road near Selaiyur police station.Go down this road for a km and half. on to your right you'll see Bharat Engg College. Take the second left opposite to that collage. It is bit long road, paved with red sand and not black topped. Down this road: carefully see to your right the area sign written only in Tamil (sorry folks, if you can't read Tamil it is your fate)you'll see a sign placed mentioning ALAMELUPURAM, [ask local there if you have any doubt better you ask opp to that college] Turn right in that nagar go down on that mud road don't see side road.down that main street, you'll see a pandal and on the right a mandap with words in
saffron/red NARBHAVEE stop there. Park your vehicle. If Auto send it back else waiting charge will eat your pocket dearly as already those auto meters are VERY HOT than the sun blazing on your face.Enter the hall that looks like a Temple. Please be seated in a place told by people there. The Ramani Guruji will call you, tell him for what you came in brief(better give it in writing)he can speak in English/Tamil/ Hindi etc. He will tell the solutions to your problems after a short meditation or if needed he'll read the jeeva nadi and tell you the solution and remedies. He doesn't charge a single pie. If you with take some fruits and flowers, that is enough. Before visiting him: Call him by phone 044 22290595. Confirm his availability and time. He normally sees from 8am to 10 am and from 6pmto 8pm daily. Try to be there at-least half an hour earlier before starting time i.e8am
or 6pm. Please be patient and he'll call you if you are destined. They above may show you that he is doing some tantick or gimmick, that is not the case. As many of you would have seen your /heard your fate after paying some hefty fees to many astrologers and naadi readers. So this free service may look odd and may cause some real doubts in your minds. But all that is a false hallucination. When calling please be brief on the phone. When called Sri Ramani will attend the call. Go with a open mind. If your destined, you'll get your solution. Onlything is faith that is all needed. His ashram and house is nearly 34Kms from City centre and about 10 Kms from Tambaram and same Ten from Velachery bus stand. Best of luck folks. Regards
Dhinakar Rajaram Iyer

शनिवार, २० नोव्हेंबर, २०१०

मी आधीपासूनच स्वतःला शहाणा समजतो, इति रिटे

रिकामटेकडा या नावाने लेखन करणाऱ्या व्यक्तीने दंभपुर्वक म्हटले की "मीआधीपासूनच स्वतःला शहाणा समजतो, त्यावर तुमचे (हैयोंचे) प्रमाणपत्र घेण्यात मला रस नाही." नंतर आपली चुक मान्य करून म्हटले, ठीक आहे, तुमचे म्हणणे योग्य आहे पण जर यं केले असते तर त्यं केले असते तर "आपला (दोघांचा) वेळ वाया गेला नसता." जो स्वतः ला रिकामटेकडा म्हणवून घेतो त्याला वेळेची चिंता कशाला असे वाटणे स्वाभाविक आहे. असो. आणखी काहींचे तारे नंतरच्या पोस्टमधे वाचा. नाडी ग्रंथांना जो जो नावे ठेवतो त्याला योग्य ती जागा दाखवून देण्याचे कार्य नाडी महर्षी बरोबर करतात..

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

उपक्रमाने नाडी ह्या प्रकाराला कायमस्वरुपी बंदी घालावी का?

हैयो हैयैयोंनी दिवाळी अंकात लिहिलेल्या नाडीग्रंथांवरील लेखाने चिडून जाऊन उपक्रमींनी हा धागा सुरू केला आहे. 

 

ओकांनी त्यांना सडेतोड उत्तरे दिलेली आहेत. 'ओक हैयो नाडी ग्रंथांची उपक्रमवर जाहिरात करत आहेत' असा मनघडंत आरोप करून ही मोहीम चालवली जात आहे. ओक किंवा हैयो वा अन्य कोणीही ज्याने नाडी ग्रंथांचा अनुभव घेतला आहे त्याने आपला अनुभव सादर केला तर तो जाहिरात म्हणून कसा होतो ते उपक्रमींच्या टोळीलाच माहित. मात्र विज्ञानाचा बुरखा घेऊन हे श्रद्धेवर झडप घालायला कसे आसुसलेले आहेत य़ाची झलक सामान्यवाचकांच्या माहितीसाठी सादर...

विज्ञानवादी विवेकवादी म्हणवून घेणाऱ्यांना नाडी ग्रंथांच्या विषयाने असे भंडावले आहे की त्यांची झोप उडाली आहे... त्यातील एक झलक पेश...

'नाडीग्रंथातील जन्मदिनाकाची नोंद - एक अभ्यास' यालेखाने तेथील अनेकांची झोप उडवली आहे असे जाणवते. हैयोंनी आपल्या नेहमीच्या शांत पण खंबीर पद्धतीने लेखन करून नाडी ग्रंथ तमिळ मधील काव्याचा एक एक विलक्षण नमुना सादर करून त्यातून असे दाखवून दिले आहे की अत्यत कमी शब्दात व्यक्तीच्या जन्मदिनाकाची त्यावेळच्या ग्रहपरिस्थितीचे वर्णन इतक्या चपखलपणे केलेले असते ते पाहून अचंभा वाटावा.तेही काव्याच्या सर्व मर्यादा पाळून...

त्यातील एका उदाहरणात दोन जुळ्याबहिणींच्या नाडी ग्रंथातील नोंदी कशा विविध प्रकारे सादर केल्या आहेत ते फारच रंजक आहे. आणखी एका उदाहरणात एका व्यक्तीचा जन्म ६जून १९७९ ला मंगळवार झाला होता असे नाडी महर्षींचे कथन त्या साईटवरील एकांनी आपल्यापद्धतीने ताडून ते चुकीचे आहे असे आव्हानात्मक प्रतिसाद घालून प्रतिपादन केले होते. मात्र हैयोंनी त्यांना प्रचलित कॅलेंडर प्रमाणे बुधवार असला तरी तो भारतीय कालगणने नुसार तो मंगळवार येतो असे ठासून सांगितल्यावर त्यांना मान्यकरावे लागले की होय तो मंगळवारच येतो म्हणून. (जन्म जर पहाटे सूर्योदयापुर्वीझाला असेल तर तो आधीच्या दिवसाची तारीख वार मानावा )यानंतर अनेकांनी नाडी ग्रंथावरील या लेखातील महत्वाच्या मुद्यांना डावलून ओरड चालू केली की नाडीज्योतिष शास्त्रासारखे विषय उपक्रमवरून काढून टाकावेत. त्यातील एक धागा ...

नाडीग्रंथ


नाडी ह्या प्रकारावर आंतरजालावरील दोनेक माणसांनी जी जाहिरात मोहिम उघडली आहे ती थांबवणे गरजेचे आहे. समाजाला मागे नेणार्‍या ह्या भोंदू गोष्टींच्या जाहिरातीमधे संकेतस्थळांचा समावेश असू नये ह्या नैतिक जवाबदारीतुन उपक्रमाने नाडी ह्या प्रकाराला कायमस्वरुपी बंदी घालावी का? उपक्रमावर ह्यापूर्वी सनातन प्रभातवाले रतीब घालायचे तो आता बंद केलेला दिसतो तसेच नाडीच्या बाबतीतही होणे गरजेचे आहे का?

बहुतेक


http://mr.upakram.org/node/2948#comment-49256 या पाळलेला राक्षस यांच्या प्रतिसादाला धरून उपक्रम नाडीप्रेमी आहे का (कारण दिवाळी अंकात नाडीवरून लेख आहे) असा प्रश्न विचारता येऊ शकतो याची काळजी वाटलेली दिसते आहे.

अर्थात याला माझे उत्तर त्या विचारांना सातत्याने विरोध करावा, हा सदस्यांकडून तसेच प्रशासनाकडून केला जावा, कारण ती ऍ़क्टिव्ह आर्थिक फसवणूक चाललेली असू शकते असे मत आहे. प्रशासनाकडून ह्या लेखांमुळे सदस्यांची आर्थिक/सामाजिक फसवणूक/वित्तहानी झाल्यास संपादक/प्रशासक जबाबदार राहणार नाहीत असा वैधानिक इशारा प्रत्येक लेखाखाली देणे सोयीचे ठरेल.

+१


जाहिरातींबाबत पूर्णपणे नकारात्मक धोरण न घेता उपक्रम संकेतस्थळाने जागरूकही असावे.

लेखकाला किंवा एखाद्या विक्रेत्याला आर्थिक फायदा होईल अशा प्रकारची माहिती देण्यास पूर्ण निर्बंध नकोत. पण काही बंधने हवीत, असे राहूनराहून वाटते.

सहमत.

प्रशासनाकडून ह्या लेखांमुळे सदस्यांची आर्थिक/सामाजिक फसवणूक/वित्तहानी झाल्यास संपादक/प्रशासक जबाबदार राहणार नाहीत असा वैधानिक इशारा प्रत्येक लेखाखाली देणे सोयीचे ठरेल.

सहमत. पण नाडी मनोरंजक आहे. द्वेष पसरविणारी नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नाडीग्रंथ


चित्राचे वरील म्हणणे योग्य वाटते. नाडीचिकित्सा हा व्यवसाय आहे. तेथे मूल्य आकारले जाते. त्याची जाहीरात आणि त्यावरून फसवणूक उपक्रम दिवाळी अंकात झाली असे लोक म्हणू शकतात असे वाटते.

पुरोगामी की प्रतीगामी


नाडीपट्टीचा धंदा करणार्‍याला 'एनी पब्लीसीटी इज अ गूड पब्लीसीटी ' वाटू शकते त्यामुळे निषेधार्ह देखील जास्त शब्दही बोलावेसे वाटत नाहीत. उपक्रमाच्या दिवाळी अंकातही नाडीपट्टीबद्दल लेख् आल्याचे पाहून उपक्रम हे संस्थळ जे पुरोगामी आहे असे वाटते त्याबद्दल फेरविचार करावासा वाटत आहे. उपक्रमाला तो लेख छापू दिल्याबद्दल काही आर्थीक फायदा झाला आहे का असा प्रश्न ह्या निमित्ताने विचारावासा वाटतो. बहूदा नसावा पण उपक्रम व्यवस्थापन याबददल खुलासा करेल काय? निदान ह्या निमित्ताने तो लेख छापू देण्यामागची भूमीका जरी कळले तर बरे होइल.

सहमत


त्यावर हिरिरीने आलेले प्रतिसाद पाहून हा सगळ्यात लोकप्रिय लेख वाटत आहे. उपक्रमाने प्रायश्चित्त म्हणून हा लेख दिवाळी अंकातून मागे घ्यावा आणि इथल्या विज्ञानप्रेमींच्या भावनांचा आदर करावा.

-डॉन कोर्लिओनी

अजिबात नाही


उपक्रमाने प्रायश्चित्त म्हणून हा लेख दिवाळी अंकातून मागे घ्यावा आणि इथल्या विज्ञानप्रेमींच्या भावनांचा आदर करावा.

उपक्रमाने कोणतेही प्रायश्चित्त घेण्याची गरज मला दिसत नाही. ही स्वघोषित विज्ञानप्रेमी संस्था साली फारच माजली आहे हल्ली! :)

आपला
गुंडोपंत

मला वाटते


लेख छापू देण्यामागची भूमीका जरी कळले तर बरे होइल.

मला वाटते एखादी गोष्ट दाबून टाकल्याने जास्त तोटा होतो. त्या ऐवजी त्याचे विवेचन, परिक्षण व चिंतन केल्याने काही मते बदलतात, बदलू शकतात. म्हणून यासाठी तरी तो लेख तेथे रहावा असे माझे मत आहे.

आपला
गुंडोपंत

मला वाटते

मला वाटते एखादी गोष्ट दाबून टाकल्याने जास्त तोटा होतो. त्या ऐवजी त्याचे विवेचन, परिक्षण व चिंतन केल्याने काही मते बदलतात, बदलू शकतात. म्हणून यासाठी तरी तो लेख तेथे रहावा असे माझे मत आहे.

सहमत,
नाडीच्या थोतांडपणा शक्य त्या ठिकाणी झोडले पाहीजे पण बंदी नको.
हवे तर खाली वाक्य टाका, उपक्रम कोणत्याही नाडीच्या दाव्याशी सहमत नाही.

कोणाचा?

मला वाटते एखादी गोष्ट दाबून टाकल्याने जास्त तोटा होतो.
त्या 'गोष्टी'च्या दुकानदारांचा तोटा होतो! आमच्या विचारसरणीचा काय तोटा?

प्रतिसाद काढून टाकावा.


प्रतिसाद काढून टाकावा.

उपक्रमाच्या लेखनविषयक ध्येयधोरणांमध्ये खालील स्वरूपाचे लेखन अपेक्षित नसल्याचे स्पष्ट आहे.
  1. सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणारे किंवा आक्षेपार्ह लेखन.
  2. व्यक्तिगत रोख असणारे किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारे कोणतेही लेखन.
  3. परस्परांविषयी किंवा इतर सदस्यांना उद्देशून व्यक्तिगत स्वरूपाचे लेखन.
ह्यास अनुसरून रिकामटेकड्यांचा वरील प्रतिसाद काढून टाकण्यात यावा ही विनंती. मुळांत दिवाळी अंकातील लेख मी (हैयोने) लिहिलेला असताना श्री. ओक ह्यांच्यावर घसरण्याचे काही कारण नव्हते, त्याहीपुढे असांसदीय भाषा उपयोजून संदिग्ध आरोप करण्याचेही कारण नव्हते.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

मूळ असांसदीय प्रतिसाद काढून टाकला आहे याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

नाही

मुळांत दिवाळी अंकातील लेख मी (हैयोने) लिहिलेला असताना श्री. ओक ह्यांच्यावर घसरण्याचे काही कारण नव्हते,
हा धागाच "दोनेक माणसांनी जी जाहिरात मोहिम उघडली आहे" या विषयावरील आहे. हा धागाच शशिकांत ओक आणि तुम्ही या दोन व्यक्तींविरुद्ध सुरू करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह


आक्षेपार्ह

असे असले तरीही तुमचा व्यक्तिगत रोख असणारा - व्यक्तिगत पातळीवर जाणारा प्रतिसाद सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणारा आणि आक्षेपार्ह आहे.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

किती आरोप?


तुम्हा दोघांच्या लेखनामुळे लोकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते अशी भीती येथे अनेकांनी व्यक्त केली आहे. "शशिकांत ओक लबाड आहेत काय ते मला माहिती नाही" या वाक्यात त्या भीतीविषयीच मत व्यक्त केलेले आहे. म्हणजे, 'लबाड' हा शब्द तुमच्या आरोपातून बाद!

दुसर्‍या आरोपाला येथे प्रिसीडंट आहे.
विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत` - भाग २
प्रेषक: प्रकाश घाटपांडे गुरू, 03/09/2009 - 12:06
--------
शुद्ध बिनडोकपणा
या नाडी-पट्ट्या व्यक्तिश: एकेका जातकासाठी नावानिशी बनवलेल्या असतात असे सांगणे म्हणजे शुद्ध लुच्चेगिरी आहे.
त्या आरोपाला एक वर्ष उलटून गेल्यामुळे तुमची मागणी टाईमबार आहे. त्या धाग्याचे ज्ञान असूनही ओक गप्प बसले, तुमचे का पोट दुखते?
'भ्रमसेन' असल्याचाही आरोप नाडीवाल्यांवर यापूर्वीच झालेला आहे.

धन्यवाद.

धन्यवाद.

मूळ असांसदीय प्रतिसाद काढून टाकल्याबद्दल संपादनमंडळास धन्यवाद.

ज्या विरोधी निबंधात तत्वज्ञान किंवा बुद्धी यावर जोर दिसत नाहीत त्यात मला रस नाही. असो.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

संभवामि धागे धागे

ज्या विरोधी निबंधात तत्वज्ञान किंवा बुद्धी यावर जोर दिसत नाहीत त्यात मला रस नाही.
तुम्हाला ते दिसत नाहीत हे दु:खद आहे.

सहमती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लेखात मांडलेला विचार तसेच वरील पाच प्रतिसादांतून(चि,ध,प्रि,स,रि) व्यक्त झालेली मते या सर्वांशी सहमत आहे. दिवाळी अंकातील हैय्यो. यांचा लेख जरी नाडीग्रंथावर असला तरी त्या ग्रंथाची अथवा भविष्याची भलावण केल्याचे दिसत नाही. तरीपण असल्या विषयांवरील लेखांना "उपक्रम" वर स्थान नसावे असेच मत आहे.

उपक्रमवर धोरण ठरलेले नाही


उपक्रमवरील दिवाळी अंकात मला वाटतं नाडीग्रंथावलोकनाच्या पद्धतीबाबत विचार मांडलेला दिसतो. नाडीपट्टीबाबत सदरील लेखकांचा सदरील विषयावर अनेकांशी त्यांचा संवाद-वादविवाद झालेला आहे. पट्टीवर असलेले कुटलिपीतील लेखन कसे असते, ते कोणाला वाचता येते, नाडीपट्टीतील प्रतिमा वगैरे हे सर्व विषय माझ्यासारख्या उपक्रमी वाचकाला नवीन आहेत. लिहिणार्‍या लिहू द्यावे. मत मांडणार्‍यांनी त्यावर मत मांडावे. उपक्रमच्या दिवाळी अंकात त्यांनी म्हटलेच आहे की, ''अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे'' तेव्हा काय वास्तवचिकित्सा वाचकांनी करायची ती करावी. नाडीपट्टीबाबत कोणा सदस्याला ते आर्थिक फायदा व्हावा म्हणून नाडीपट्टीचिकित्सेचा आग्रह धरत असतील किंवा नाडीपट्टीची जाहिरात ते करत असतील तर सदस्यांनी व्यवस्थापनाकडे त्याबाबत भावना पोहचवल्या पाहिजेत असे वाटते. मात्र लेखन प्रतिगामी आहे, पुरोगामी नाही म्हणून लेखन ठेऊ नये हे पटणारे नाही. उपक्रमचे अशा लेखनाबाबत कोणतेही धोरण ठरलेले नाही. [ठरले असेल तर तसे वाचनात नाही] त्यामुळे लेखन बंदी वगैरेचा प्रश्नच उरत नाही.

-दिलीप बिरुटे

हेच


सर अगदी बरोबर म्हणतात तुम्ही.

कोणत्याही प्रकारची मुस्काटदाबी करणे योग्य नाही असे माझे मत आहे. त्या ऐवजी लेखात म्हंटल्या प्रमाणे अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तव चिकित्सा करणे अभिप्रेत आहे, ती ज्याची त्याने करावी.

आपला
गुंडोपंत

:)

त्या ऐवजी लेखात म्हंटल्या प्रमाणे अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तव चिकित्सा करणे अभिप्रेत आहे, ती ज्याची त्याने करावी.
"ज्याची त्याने करावी" म्हणता तर 'समुदाय' कशाला हवा?

ज्योतिष

नाडीमध्ये रस नसल्याने मी सदर लेख वाचलेला नाही परंतु यनांच्या म्हणण्याप्रमाणे त्यात भविष्याची भलावण केलेली नाही हे मी मानते.

उपक्रमावर ज्योतिष असा समुदाय आहे. तो बंद करण्याविषयी किंवा त्याचे वर्णन/धोरण बदलण्याविषयी यापूर्वीही चर्चा झाल्या आहेत. उपक्रमाच्या अपग्रेडसोबत काही निरुपयोगी समुदायांकडे नजर टाकणे योग्य राहिल.

ज्योतिष हा समुदाय तसाच ठेवला जावा


उपक्रमावर ज्योतिष असा समुदाय आहे. तो बंद करण्याविषयी किंवा त्याचे वर्णन/धोरण बदलण्याविषयी यापूर्वीही चर्चा झाल्या आहेत. उपक्रमाच्या अपग्रेडसोबत काही निरुपयोगी समुदायांकडे नजर टाकणे योग्य राहिल.


ज्योतिष हा समुदाय तसाच ठेवला जावा असे माझे मत आहे. त्यावर चर्चाही घडल्या पाहिजेत. फक्त तर्कट लोकांच्या त्यांच्यामते असलेल्या वैज्ञानिक चर्चा करण्यासाठीच हे स्थळ बनू नये ही असे वाटते.
आपला
गुंडोपंत

अस्सं का?


तेथे गेल्या ३६० दिवसांत 'ज्योतिषशास्त्र' या विषयासाठी समर्थक काहीही लेख आलेला नाही. तुम्ही त्या समुदायात एखादा अभ्यासपूर्ण लेख टाका बरे! अन्यथा, "उपक्रमवरील 'ज्योतिषशास्त्र' समुदाय मृत आहे काय?" अशी चर्चा सुरू व्हायची ;)

जरासा खुलासा


कुठलाही विषय वर्ज नको हे तत्वतः पटते. त्याच बरोबर संस्थळ व्यवस्थापनाचा त्याबाबत अंतीम अधिकार हेही पटते. नाडीपट्टीबद्दल उपक्रमावर लेख असणे तितकेसे पसंत नसले तरी ते माझे वैयक्तिक मत आहे, मला आवडत नाही म्हणून उपक्रमावर कोणी माहीतीपूर्ण लेखन करु नये असे माझे म्हणणे नाही. (पक्षी: असू द्या ज्योतीष समुदाय, येउ द्या नाडीलेख)

मराठी संस्थळाबाबत 'दिवाळी अंक' हा एक त्यातल्या त्यात "पवित्र" मानला गेलेला प्रकार आहे अशी माझी (भाबडी??) समजूत. त्यामुळे पुरोगामी माहीतीपूर्ण संस्थळ अशी एक प्रतिमा असलेल्या उपक्रमाच्या दिवाळी अंकात नाडीपट्टी सारख्या विषयाबाबत रुची/ अभ्यासपूर्ण असे काही कुतूहल निर्माण करणारे लेख यावेत हे काही पटले नाही.

आता उपक्रमाने नाडीपट्टीवर विशेषांक काढला तरी आपण कोणीही (फार तर उपक्रमसंन्यास घेण्याव्यतिरिक्त फारसे विशेष असे) काही करु शकत नाही. (असेही म्हणा लोक कोणत्याही संस्थळाचा, विषयाचा कितीही दुस्वास केला तरी तिथे तिथे जातात व तो विषय व आपला निषेध उगाळत बसतच असतात.)

उपक्रम संस्थळ चालवणारे लोक नेहमीच्या संभाषणातले लोक आहेत त्यांना सहज हा प्रश्न विचारला तर उत्तर मिळावे अशी अपेक्षा. किमान उपक्रमाच्या नियमीत वाचकाला तसा लेख निदान दिवाळी अंकात येण्याबद्दल आक्षेप का वाटतो हे उपक्रम व्यवस्थापनाला कळवण्यासाठी हा प्रतिसाद.

हंगामा है क्यों बरपा

हंगामा है क्यों बरपा
विज्ञानाला कशाचेच वावडे नसते. शोधकार्याला कुठलाच विषय त्याज्य नसतो.
पुरोगामी विचाराचा तो मूळ गाभा आहे.

नाडीग्रंथांचा भाषेच्या दृष्टीकोनातून केला गेलेला अभ्यास याचा दुस्वास करून वा त्याला या संस्थळावरून कमी करून तो कसा साधला जाईल?
उलट विचार करायला लावणाऱ्या दुरस्थ भाषेतील काव्याचे बारकावे समजून घेणे, त्याचा मराठी वा अन्य भाषातून कसा उपयोग केला गेला आहे याचा तौलनिक अभ्यास करायची ती अनुकूल संधी म्हणून वापरावयाला पाहिजे. तमिळ भाषा व तिचा अभ्यास हा फक्त हैयोहैयैयोंनी घेतलेला मक्ता नाही. अन्य भाषाशास्त्र तज्ञांनी यात आपले लक्ष केंद्रित करायला त्या लेखातून प्रेरणा घेण्यासाठी केलेला प्रयास असे हैयोंना अपेक्षित असावे.

त्या लेखातील भाषा, लिपी व काव्यालंकाराच्या विषयाला विविध बाजूंनी पहायला काय हरकत आहे? या स्थळावर काव्यशास्त्रविनोदावर चर्चा रंगतात. त्यातील देशी आणि विदेशी भाषेवर काम करणाऱ्या आपल्या तज्ज्ञांनी हा विषय त्याच्या माहितीतल्या भारतीय भाषांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांसमोर मांडावा. या संस्थळावरील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्यांनी या विषयावर काम करायला पुढे यावे. नाडी ग्रंथातून काय सांगितले जाते ते तूर्तास बाजूला ठेवून त्यातील काव्याचा आस्वाद - अत्यंत कमी शब्दांचा वापर, तोही काव्यातील प्रास-अनुप्रास आदीचे सर्व संकेत पाळून अर्थपुर्ण रचना करणे, ताडपट्टीवर कष्टपुर्वक लिहिण्य़ाची कला, त्याला लागणारी एकतानता - घ्यायला काय हरकत आहे.
या संस्थळाचा व त्यातील तज्ज्ञांचा सकारात्मक सहभाग असेल तर फार छान. नाही का?
संपादकांनी यावर निश्चित विचार केलेला असेल.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

हा हा हा

नाडी ग्रंथातून काय सांगितले जाते ते तूर्तास बाजूला ठेवून त्यातील काव्याचा आस्वाद - अत्यंत कमी शब्दांचा वापर, तोही काव्यातील प्रास-अनुप्रास आदीचे सर्व संकेत पाळून अर्थपुर्ण रचना करणे, ताडपट्टीवर कष्टपुर्वक लिहिण्य़ाची कला, त्याला लागणारी एकतानता - घ्यायला काय हरकत आहे.


ललित मोदी ऐकले होते आता ललित नाडी पण ऐकले. वा भाई वा!!!! मग इतके दिवस नाडीकेंद्रावर जा, स्वता अनुभव घ्या हे त्यातील काव्यअविष्काराबद्दल सांगत होतात होय?

या संस्थळाचा व त्यातील तज्ज्ञांचा सकारात्मक सहभाग असेल तर फार छान. नाही का?

बरोबर उद्या कोणी एखादे वाक्य कलात्मक आहे असे म्हणले तर उपक्रमावर म्हणजे एका विज्ञानवादी संस्थळावर विज्ञानवाद्यांनी आता नाडीपट्टीला मान्यता दिली आहे अशी जाहीरातबाजी सुरु व्हायला वेळ लागणार नाही.
दुसर्‍या एका चर्चेत विशाल तेलंग्ने यांनी उधृत केलेले शेवटचे वाक्य इथेही लागू पडते असे वाटते.

माझं नाव

[...]विशाल तेलंग्ने[...]
माझं नाव विशाल तेलंग्रे असे आहे. तेलंग्रे शब्दाची विभक्ती करुन दाखवली तर तो त्+ए+ल्+ं+ग्+र्+ए असा होतो. :P इंग्रजीत मी Telangre असे लिहितो. ;)

नाडी ग्रंथ थोतांड आहेत

नाडी ग्रंथ थोतांड आहेत, थोतांड आहेत असे त्याचा अनुभव न घेताच सारखे म्हणत राहणे व ज्यांना पहायला जावेसे वाटेल त्यांच्या मनांत उगाचच संभ्रम निर्माण करणे हीच खरी जाहिरातबाजी नव्हे काय?
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

आक्षेप

नाडी ग्रंथ थोतांड आहेत, थोतांड आहेत असे त्याचा अनुभव न घेताच सारखे म्हणत राहणे व ज्यांना पहायला जावेसे वाटेल त्यांच्या मनांत उगाचच संभ्रम निर्माण करणे हीच खरी जाहिरातबाजी नव्हे काय?
हा लोडेड प्रश्न आहे. "जाहिरातबाजी नाही" असे उत्तर दिले तरी "मनांत उगाचच संभ्रम निर्माण करणे" हा आरोप स्वीकारावा लागेल.
--------
संशय 'उगीचच' नाही, तार्किक किंवा प्रात्यक्षिक यांपैकी कोणतेच आधार तुम्ही देत नसल्यामुळे संशय आहे.
--------
उत्पादनाचा खप वाढेल अशी वक्तव्ये करणे हे कधी जाहिरातबाजी असते तर कधी प्रामाणिक, वैयक्तिक अनुभवांचे प्रकटीकरण असते (तुम्ही काय करता आहात त्याची खात्री नाही). पण उत्पादनाचा खप कमी होईल असे वक्तव्य करणे ही कधीच जाहिरातबाजी नसते. "नाडीवाल्यांना पैसे देण्याऐवजी ते अंनिसला द्या", इ. विधाने केली तर त्याला जाहिरातबाजी म्हणता येईल.

विशेष आश्चर्य वाटले नाही.

विशेष आश्चर्य वाटले नाही. 

उपक्रमावर २९५२ वा नोड थोडासा उशिरानेच वाचला. सदस्यांच्या प्रतिक्रिया वाचून विशेष आश्चर्य वाटले नाही.

श्री. यनावाला सर, आपले काही शब्द उसने घेतो:

प्रत्येक क्षेत्रात आपली बुद्धी काही वेगळीच असल्याचा समज बाळगणा-या काही तर्‍हेवाईक व्यक्ती असतात. आपला जन्म जग बदलण्यासाठीच असल्याचा त्यांचा दृढ विश्वास असतो. साधारणत: वास्तवापासून दूर राहणे आणि तारतम्याचा अभाव हीच त्यांची मानसिकता असते. आपल्याला उपजतच सारे काही ज्ञान आहे अशा भ्रमामुळे अभ्यासही फारसा नसतो, मात्र ते स्वत:शी प्रामाणिक असतात. ते जे सांगतात ते त्यांना मनापासून खरे वाटत असते. कुणाला फसवायचा उद्देश नसतो. ते लबाड नसतात. नाडिकेंद्रातही न जाता, केवळ दिव्यदृष्टी(!)नेच बसल्या ठिकाणी चिकित्सा करणारे भ्रमसेन बहुपरिचित आहेत. स्वत:चे आत्मज्ञान इतरांना देणे हेच आपले जीवितकार्य आहे असे समजून ते प्रतिसाद इ. लिहितात. काही श्रद्धाळू अनुयायी मिळूनही अपेक्षित परिणाम मात्र साधत नाही. ह्यांच्या चिकित्सेला सर्वमान्यता मिळत नाही. मग "कंपूशाही, प्रस्थापितांची गटबाजी, जाहिरातबाजी" असा त्रागा करतात, परंतु भ्रमाचा भोपळा काही फुटत नाही - मनातील असुरक्षिततेची भावना काही संपत नाही.

आधुनिक विज्ञानास सार्‍या गोष्टी माहित असल्याचा ह्या भ्रमसेनांचा दावा असेल, परंतु तो दावा स्वत: विज्ञानास मान्य नाही. राहता राहिला प्रश्न नाडिग्रंथ ह्या विषयावर बंदी घालण्याचा - ह्या मागणीने पाकिस्तानवरील धाग्याची आठवण झाली. "उपक्रम दिवाळी अंकावर एका मनुष्याच्या हातून लिहिलेला लेख ठेवू देण्यास बरोबरच्या काही सदस्यांनी नकार दिला. (कारण दिवाळी अंकाला त्यांच्या नावडत्या विषयाचा स्पर्श झाला होता). ह्यावर त्या मनुष्याने "तुमच्या (तथाकथित नाममात्र) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांच्या मनांमध्येदेखील खोल कूपमण्डूकवृत्ती आणि अपार अंधश्रद्धा आहेच ना?" असा प्रश्न करून (तथाकथित नाममात्र) अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील भ्रमसेनांचा 'अपमान' केला." अन् चवताळले की हो सारे भ्रमसेन..!
असो. अशा या सर्व भ्रमसेनांकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. स्वत:स विज्ञानवादी म्हणविणारांचा बालिशपणा पाहून मिशीतल्या मिशीमध्ये सखेद हसू मात्र उमटते. शेवटी, अपेक्षित त्या वळणावर चर्चा आणली असे म्हणायचे. असो. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे! ;-)

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

डोळे अंमळ पाणावले

तुमच्याकडून अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती.

जशास तसे!

जशास तसे!
जशास तसे ह्या न्यायानेच ना? ;-)
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

माहिती नाही

न्यायशास्त्रवाल्या चर्चेतील डॉक्टर वेगळे आहेत, मी नाही.

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

मानो या ना मानो २नाडी ग्रंथांवरील एपिसोड

मानो या ना मानो २ ६ नोव्हेंबर२०१० च्या पाडवा दिवाळीच्या दिवशी रात्री १०३०नाडी ग्रंथांवरील एपिसोड - ५भागात डॉ.दिलीप नाहर यांच्या पुर्वजन्मच्या व्यक्तित्वाच्या शोधात -

टक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात - अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.

टक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात... खालील गरज पडाचे कारण असे की हैयोहैयैयो नामक एका व्यक्तीने नाडीग्रंथांच्या ताडपट्यातील तमिळ कूट लिपीचा अभ्यास करून एक लेख प्रसिद्ध केला. त्याला अंनिस वाले प्रतिवाद करू इच्छितात पण तमिळ भाषेतील तज्ञांची साथ त्यांना मिळाली नाही म्हणून ते नाडी ग्रंतांना थोतांड म्हणून सिद्ध कारयला कमी पडतात असे वाटून हा धागा इथे थोड्या अनपेक्षितपणे घालावा लागत आहे. वाचकांना हैयोंचा लेख इथे वाचता येईल. मदत तातडीची हवी आहे, म्हणून राग नसावा.

टक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात - अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.

हैयो हैयैयो, 

आपल्या प्रमाणे तमिळ भाषेची जाण असणारा, पट्टीतील लिपिचा तज्ञ आणि जो आपण प्रतिपादन करता त्याला खोडून काढून नाडीच्या ताडपट्ट्यातील भाषा तमिळ नसते त्यात व्यक्तीची नावे व अन्य माहिती कोरून लिहिलेली असणे शक्य नाही असे ताडपट्टीतील मजकूर तपासून पाहून त्यावरून आपल्या लेखातील हवा काढून टाकणाऱा विवेकवादी व अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.

इथे महाराष्ट्रात नाही मिळाला तर भारता बाहेर वा तमिळनाडूतील आमच्या समान विचारच्या संघटनांशी संपर्क साधून मिळवायचे प्रयत्न जारी आहेत. काळजी नको. य़श मिळणारच. 

तोवर एक विचारणा - काहो हैयो हैयैयो, आमच्या संघटनेला अंतिमतः यश मिळणार का? की आम्ही धुळीला मिळणार? याचे भविष्य मिळेल का पहायला?

थोडी गोची अशी आहे की आमच्यापैकी कोणी नाडी भविष्य पाहू म्हटले तरी ते शक्य नाही कारण संघटनेचे पदाधिकारीच जर नाडीच्या केंद्रात गर्दी करून बसले तर मग आमची काय राहिली? नाही का? 

म्हणून गळ घातली इतकेच. 

बाकी आपण केलेले शोध कार्य फार भारी आहे यात शंका नाही. फक्त आमच्या बाजूने आपण नाहीत याची खंत वाटते.

रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०

ठीक आहे, स्पष्टीकरण मी स्वीकारतो.

ठीक आहे, सूर्योदयाआधी (उदा., ६ जून १९७९ रोजी पहाटे ३-४ च्या आसपास चित्रा नक्षत्र होते तेव्हा) आधीच्या दिवशीचाच वार मानावा हे भारतीय पंचाग प्रकारचे स्पष्टीकरण मी स्वीकारतो.

काल पर्यंत स्वतःच्या बुद्धीवर फाजिल आत्मविश्वास असलेले रिकामटेकडा नावाने लेखन करणारे व्यक्ती दि १४ नोव्हेंबरच्या टिपणीत एकदम हैयोंचे म्हणणे मान्य करतात की त्या विशिष्ठ नाडी पट्टीतील व्यक्तीचा जन्म 6 जून 1979 ला बुधवारी नसून भारतीय काल गणने प्रमाणेमंगळवार ला झाला हे नाडी महर्षींचे ताडपट्टीतील लेखन अचुकच होते. 'हेआधीच सांगितले असतेत तर' असे हैयोंना विचारतात! पण वार गणनेत चूक झाली म्हणून इतर जो संदर्भ हैयोंनी लेखात दिलेत त्याला ठोकरून लावतात. ते कसे ते वाचा...


रिटे चे म्हणणे लाल तर हैयोंचे निळ्या रंगात

....१. "रिकामटेकड्याने लेख नीट वाचला नाही" असे तुमचे निरीक्षण असेल तर नेमका कोणता मुद्दा माझ्या वाचनातून निसटला आहे ते कृपया सांगा.
....ग्रेगरीचा बाप आला तरी माझी अक्कलच दामटेन.

काही चिकित्सकमंडळी पूर्वग्रहदोषाकारणे चिकित्सेतील मुख्य तत्त्वें सोडून इतरत्र भरकटत असतात असे मला नेहमी वाटत आलेले असल्याचे मी पूर्वीही सांगितलेले आहे. आपल्याही वाचनातून एक महत्त्वाचा मुद्दा निसटून आपण इतरत्र भरकटलेले दिसता. असो. निसटलेला मुद्दा असा: नाडिवाचकास आपला जन्मदिनांक प्रचलित पद्धतीप्रमाणे आंग्लभाषेमध्ये सांगण्यासाठी गणित घालणे आवश्यक असते आणि त्यासाठी भारतीय कालमापनपद्धतीचा सखोल अभ्यास असणे अत्यावश्यक असल्याचे मी लिहून दिलेले आहे. त्यामुळे शक्य होणार असल्यास आपली अक्कल भारतीय कालमापनपद्धतीप्रमाणे दामटा. ग्रेगरीच्या बाप काढण्याची आवश्यकता काही नव्हतीच मुळी! ;-) असो. शास्त्रशुद्ध भारतीय कालमापनपद्धतीप्रमाणे त्या विशिष्ट जातकाच्या जन्मसमयी मंगळवार असणे सयुक्तिकच आहे.
....जातक तेथे जाण्यापूर्वी नाड्या लिहिल्या गेल्या काय हा एक कळीचा मुद्दा आहे.
अहो, जातक नाडिकेंद्रात जाण्यापूर्वीच काय, जातकाच्या जन्माच्याहीपूर्वी इतके यथातत्त्व लेखन केले गेले असल्याचा नाडिग्रंथप्रेमींचा दावा असतो. हा दावा हाच अभ्यासाचा / संशोधनाचा / चिकित्सेचा विषय होय - ह्या माझ्या पूर्वीच्या एका विधानास आपण (अप्रत्यक्षरीत्या कां होई ना) लिखित मान्यता दिल्याबद्दल आपणांस अनेकानेक धन्यवाद. नाडिग्रंथ ही हस्तलिखिते असल्याने, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र हे दोन विषय नाडिग्रंथांच्या अभ्यासास अपार सहाय्य करू शकतांत; ह्या अनुषंगाने लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे असे मी पूर्वीच सुचविलेले होते, त्याचे महत्त्व ह्यावरून इतरांस कळावे. असो.
....तुम्ही जी चार उदाहरणे दिली आहेत त्या नाडीपट्ट्या बनविणार्‍या नाडीतज्ञांच्या प्रामाणिकतेविषयी (आणि त्या अनुषंगाने जातकांच्या भोळसटपणा नसण्याविषयी) मला शंका आहे: "ठशांवरून नाडी का सापडावी?" याचे उत्तर माझ्याकडे नाही (कोणाकडेच नाही). लोक खोटे बोलतात असे अनेकदा दिसते. .....म्हणूनच, "ठशांवरून नाडी शोधून देणारे ढोंगी असतात" हा आमचा 'तात्पुरता' निष्कर्ष शास्त्रीयच आहे. तो चुकीचा ठरविला गेला तर नक्कीच मान्य करू पण तोवर नाडीशास्त्राला थोतांड म्हणण्याचा आमचा हक्क तुम्ही कृपया मान्य करा.
.....मी पट्टी शोधू शकत नाही. जरी तामिळ शिकलो तरी मुळात, ठशांवरून नाडीपर्यंत पोहोचण्याची पद्धत गुप्तच आहे. ती जादू नाडीतज्ञांनाच करावी लागणार.
....व्यक्ती नाडीकेंद्रात जाणार नाहीत ही अट मान्य करून, केवळ, अनेक व्यक्तींच्या बोटांचे ठसे पाहून कोणी नाड्या देणार असेल तर "अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे.
आपली माहिती अर्धवट आहे. "ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" हे विधान माझ्या लेखनामधील नाही. (तो नाडिग्रंथप्रेमींचा दावा समजावा.) असो. आपण स्वत: प्रामाणिक असाल, भोळसट नसाल, तर आणि खोटे बोलणार नसाल, तर रिकाम्या वेळाचा उपयोग करून स्वत: चिकित्सा आरंभा. येथे चिकित्सेमध्ये, आपण स्वत:चीच पट्टी शोधली पाहिजे असा काही नियम नाही. नाडिकेंद्रात जा, कोठलीही एखादी पट्टी हाती घ्या, निरिक्षण करा, वाचा / वाचून घ्या, चिकित्साभ्यास करा आणि त्याआधारे स्वत:चे निष्कर्ष मांडा. परंतु कृपा करून बिनडोक, पूर्वग्रहदूषित आणि अभिवृत्तीग्रस्त निष्कर्षास मान्यता देण्याचा हट्ट माझ्यापुढे करू नका.
मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षानुभव विरुद्ध प्रत्यक्षानुभव असा वितर्क होणे शास्त्रीय चिकित्सेस अपेक्षित असते. ज्यांना हे प्रतिपादन पटले आहे, त्यांनी जोवर प्रत्यक्षानुभव शक्य होत नाही तोवर वितर्क करावयाचा नाही असे ठरवून घेतलेले आहे, हे आपणांस ठावूक असेलच. ;-)
....२. एखाद्या सिद्धतेतील एक दुवा जरी निखळला की संपूर्ण डोलारा कोसळतो. त्यासाठी बाकीचा लेख वाचण्याची आवश्यकता नसते.
....मी आधीपासूनच स्वतःला शहाणा समजतो, त्यावर तुमचे प्रमाणपत्र घेण्यात मला रस नाही. विमल जालान, वेणुगोपाल रेड्डी, किंवा....
....स्वतःचा जन्मवारही अज्ञात असलेला जातक वापरणारा लेख विश्वासार्ह नाही. गेम ओवर.
वा, वा, रिकामराव! काय ती अभिवृत्ती! काय तो आवेश! काय तो अभिनिवेश! काय ती खोल, खोल रुतून बसलेली स्वतःच्या बुद्धीवरील अपार अंधश्रद्धा! अहो, एखाद्या तर्क-सिद्धतेतील एक दुवा जरी निखळला की संपूर्ण डोलारा कोसळतो! त्यासाठी बाकीचा बिनडोकपणा ऐकण्याची आवश्यकता नसते! खरेतर प्रत्यक्षानुभवाची भीति वाटत असेल तर तसे प्रांजलपणे मान्य करा, त्यात काही कमीपणा मानू नका - असे केल्याने आपला प्रामाणिकपणाच सिद्ध होईल! स्वत:च्या तर्कबुद्धीवर अपार अंधश्रद्धा, त्यासह पूर्वग्रहदोषही असल्याने; आपल्याच्याने केली जाणारी चिकित्सा ही अजिबात विश्वासार्ह नाही!
सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. आपल्या फ्लॉप् तर्क - सिद्धतेत आता निखळणेसाठी दुवाच शिल्लक नसावा! श्री. रिकामराव, आता गेम आवरा! ;-)
अवांतरः-
....सुब्बाराव* यांचे प्रमाणपत्र मिळणार आहे काय?
श्री. सुब्बारावांचे नांव घेतलेत म्हणून विचारतो. रु. १०० च्या चलनावर श्री. सुब्बारावांनी देवनागरीसह अन्य कोण्या लिपीमध्ये स्वाक्षरी केली आहे, हे आपणांस ठावूक आहे काय? ;-)
-
हैयो! हैयैयो!
Posted by हैयो हैयैयो on 14 Nov 2010 at about 15:48.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Posted by रिकामटेकडा on 14 Nov 2010 at about 16:51.

ठीक

भारतीय कालमापनपद्धतीचा सखोल अभ्यास असणे अत्यावश्यक असल्याचे मी लिहून दिलेले आहे. त्यामुळे शक्य होणार असल्यास आपली अक्कल भारतीय कालमापनपद्धतीप्रमाणे दामटा.
ठीक आहे, सूर्योदयाआधी (उदा., ६ जून १९७९ रोजी पहाटे ३-४ च्या आसपास चित्रा नक्षत्र होते तेव्हा) आधीच्या दिवशीचाच वार मानावा हे भारतीय पंचाग प्रकारचे स्पष्टीकरण मी स्वीकारतो. हे स्पष्टीकरण आधीच्या प्रतिसादात देऊन तुम्हाला तुमचा वेळ वाचवता आला असता.
अहो, जातक नाडिकेंद्रात जाण्यापूर्वीच काय, जातकाच्या जन्माच्याहीपूर्वी इतके यथातत्त्व लेखन केले गेले असल्याचा नाडिग्रंथप्रेमींचा दावा असतो.
"विशिष्ट तारीख आणि वेळ असताना नेमकी काय ग्रहस्थिती असते? या प्रश्नाचे उत्तर आधीच लिहून ठेवणे शक्य असते" इतकाच मर्यादित दावा असेल तर तो शक्य आहे. व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख/वेळ ओळखली जाते हा दावा त्यात जोडला नसेल तर माझा काहीही विरोध नाही.
"ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" हे विधान माझ्या लेखनामधील नाही.
"नाडिग्रंथांसंबंधी जे अनेक दावे केले जातांत त्यापैकी एक मुख्य दावा म्हणजे त्यांत व्यक्तीचे नांव, जन्मदिनाची नोंद कोरून येणे हा होय." आणि "व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद कोरून येते हे म्हणणे बरोबर आहे काय ह्या प्रश्नाचे सिद्ध उत्तर देण्यासाठी..." ही विधाने तुमचीच आहेत. म्हणजे, नाडीत व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद असते असा तुमचा दावा आहे. ("नाडीत एका दिवशीच्या एका वेळेच्या ग्रहस्थितीची नोंद असते" या दाव्याला कोणी विरोध केला आहे काय?) म्हणजे, विशिष्ट तारीख/वेळ असलेली नाडी विशिष्ट व्यक्तीशी जोडण्याची काहीतरी पद्धत असल्याचा तुमचा दावा आहे. 'ठसे' हा असा एक संबंध सांगितला जातो. तसा काहीच संबंध नसेल तर "व्यक्तीची जन्मवेळ घड्याळात सापडते" अशा प्रकारचा निरर्थक दावा शिल्लक राहील. (दावा निरर्थक का? घड्याळात विविध अशा ८६४०० वेळा दिसतात. त्या सार्‍यांचे फोटो काढून ठेवले तर व्यक्तीची जन्मवेळही त्यांपैकी एक असतेच. व्यक्तीला जन्मवेळ विचारून त्यानुसार फोटो शोधून दिला तर त्यात काय कौतुक? अर्थात, "अब्जावधि ग्रहस्थितींच्या नाड्या इवल्याश्या इमारतीत मावतात आणि प्रत्येक व्यक्तीची नाडी त्यात असते" हाही दावा सिद्ध झाला तर कौतुकास्पदच आहे!)
मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षानुभव विरुद्ध प्रत्यक्षानुभव असा वितर्क होणे शास्त्रीय चिकित्सेस अपेक्षित असते. ज्यांना हे प्रतिपादन पटले आहे, त्यांनी जोवर प्रत्यक्षानुभव शक्य होत नाही तोवर वितर्क करावयाचा नाही असे ठरवून घेतलेले आहे, हे आपणांस ठावूक असेलच.
प्रत्यक्षानुभवाची भीति वाटत असेल तर तसे प्रांजलपणे मान्य करा, त्यात काही कमीपणा मानू नका
"त्या नाडीकेंद्राच्या इमारतीत जितक्या नाड्या मावतील त्या सार्‍यांमध्ये एका-एका तारखेच्या विशिष्ट वेळेच्या ग्रहस्थितीचे वर्णन केलेले असते" या दाव्यालाही कोणी विरोध करीत नाही. तो दावा प्रत्यक्ष अनुभवाशिवायच मान्य करण्यात मला भीती वाटत नाही.

-

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे ? नाही, मुळीच नाही

हैयोंच्या नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास हा लेख उपक्रमच्या २०१० दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाला. त्यावर रिकामटेकडा नामक एका विवेकवादीसदस्याने त्यावर जे वक्तव्य केले आहे त्यावरून नाडी ग्रंथांनी त्यांची त्यांच्या विचारांच्या समर्थकांची झोप उडवलेली आहे असे जाणवते

 अंधश्रद्धानिर्मूलन करणाऱ्यांच्यावर विवेकवादी वा विज्ञानवादी विचारांचा इतका भयंकर पगडा आहे की ते हमरी तुमरीवर येतात आणि आमचे तेच खरे असा वाद घालतात. हे लोक स्वतःच्या वैज्ञानिक अन्धश्रद्धा उराशी घट्ट बाळगून जपत असतात. मात्र त्यांच्या विचारांना न मानणाऱ्यांच्या श्रद्धा निर्मूलनाच्य़ा लायकीच्या आहेत असे ठरवून त्या घालवण्याचा मक्ता आपणाकडे ठेऊन घेतात. याचा प्रत्यय खालील वाचनातून लक्षात येईल. खालील संवाद हैयोरिटे यांच्यातील आहे

रिटेः "रिकामटेकड्याने लेख नीट वाचला नाही" असे तुमचे निरीक्षण असेल तर नेमका कोणता मुद्दा माझ्या वाचनातून निसटला आहे ते कृपया सांगा. एखाद्या सिद्धतेतील एक दुवा जरी निखळला की संपूर्ण डोलारा कोसळतो. त्यासाठी बाकीचा लेख वाचण्याची आवश्यकता नसते.
    दाव्यांबाबतच्या सत्यासत्यतेविषयी ठाम निष्कर्षासही येतां येईल.
    तुम्ही जी चार उदाहरणे दिली आहेत त्या नाडीपट्ट्या बनविणार्‍या नाडीतज्ञांच्या प्रामाणिकतेविषयी (आणि त्या अनुषंगाने जातकांच्या भोळसटपणा नसण्याविषयी) मला शंका आहे: "ठशांवरून नाडी का सापडावी?" याचे उत्तर माझ्याकडे नाही (कोणाकडेच नाही). लोक खोटे बोलतात असे अनेकदा दिसते. म्हणूनच, "ठशांवरून नाडी शोधून देणारे ढोंगी असतात" हा आमचा 'तात्पुरता' निष्कर्ष शास्त्रीयच आहे. तो चुकीचा ठरविला गेला तर नक्कीच मान्य करू पण तोवर नाडीशास्त्राला थोतांड म्हणण्याचा आमचा हक्क तुम्ही कृपया मान्य करा.
    मूळ मुद्दा मांडावयाचा तो असा, की नाडिग्रंथांमधून जन्मरास आणि लग्नरास "लिहिलेली असते" अथवा "लिहिलेली नसते" असा कोणत्याही प्रकारचा दावा ठोकण्याआधी स्वत:च्या अनुभवावर आधारीत दाव्याची भाषाशास्त्रीयदृष्ट्या खात्री करून घ्यावी.
    व्यक्ती नाडीकेंद्रात जाणार नाहीत ही अट मान्य करून, केवळ, अनेक व्यक्तींच्या बोटांचे ठसे पाहून कोणी नाड्या देणार असेल तर "अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे.
    

    अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे

    रिटे ओक यांतील संवाद

    व्यक्ती नाडीकेंद्रात जाणार नाहीत ही अट मान्य करून, केवळ, अनेक व्यक्तींच्या बोटांचे ठसे पाहून कोणी नाड्या देणार असेल तर "अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे.
    त्या नाडीपट्ट्या बनविणार्‍या नाडीतज्ञांच्या प्रामाणिकतेविषयी (आणि त्या अनुषंगाने जातकांच्या भोळसटपणा नसण्याविषयी) मला शंका आहे:

    जर शंका आपणांस आहे तर त्याशंकेचे निरसन आपणालाच प्रत्य़क्ष अनुभवाने व नाडीग्रंथांची विविध अंगांनी परीक्षा फावल्या वेळात करायला नको काय? हे काम आपण टाळण्याने आपणांस शाब्दिक लेखनात फक्त रिता वेळ घालवायचा आहे, असा समज होतो.

    हैयोंचा लेख नाडी पट्टीत जे कूट तमिळ लिपीतून लिहून येते त्याच्या ओळींची फोडकरून सामान्य तमिळ भाषेत ते मांडून गैर तमिळ लोकांना त्यातील अर्थाची ओळख करून देणे असा आहे. त्याअर्थांच्या विश्लेषणाच्या बाबत आपणांस काही विचारणा करावीशी वाटत असेल तर त्याबद्दल तेथे चर्चा होऊ शकते. ३जून१९७९ला बुधवार येतो हे विधान वगळता ज्याअर्थी तशी आपण ती करत नाही त्या अर्थी हैयोंच्या अर्थाची फोड आपणांस मान्य आहे असे मानावे लागेल. पर्यायाने नाडी ग्रंथांच्या पट्यात जन्मदिनांक व त्यावेळची ग्रहस्थिती श्लोकबद्ध असते हे मान्य आहे. बुधवार का मंगळवार याचे विश्लेषण नाडी केंद्रातील तज्ञांकडून केले जाऊ शकते. आपणास वेळ मिळाला तर कोणत्याही केंद्रातून ते मिळवावे.

    आता ते श्लोक खरोखरीच तेथे असतात की नाही या शोधासाठी आपण नाडी केंद्रात जायचे का नाही याची गरज निर्माण करून निर्माण होणाऱ्या समस्येला आपण वा आपल्या सारख्या विचारांच्या लोकांनी तो प्रश्न नाडीकेंद्र वाल्यांशी विचार विनिमय करून सोडवावा लागेल. त्यांनी मान्य केले तर आमच्यासारख्या इतरांनी हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण त्यासाठी आपणाला पुढाकार घेऊन तुम्हीच तो सोडवला पाहिजेत.

    नाडी केंद्रात न जाताच नाडी ग्रंथांचा अनुभव केवळ ठसे पाठवून व ताडपट्या पाहून परीक्षा घेण्याचा आपला आग्रह असेल ही. पण हैयो आपल्याला लेखातून आपण म्हणता त्या तऱ्हेनी नाडी पट्ट्या शोधतात असा दावा जर करत नाहीत आणि नाडीतज्ञ वाचक नाडी पट्या केंद्रात बसून(नव्या) बनवतात अशी नाडीवाचकांच्याच्या प्रामाणिकतेची शंका आपणास असेल तर त्यांना भेटून त्यांच्या कडून ती सप्रमाण निरसन करून घ्यायला जे काही करावे लागेल ते आपणासारख्यांनी करायचे आहेत.

    अपेक्षा करतो की हैयोंनी जशा काही नाडी पट्ट्यांचा अर्थ सादर करून व त्याची फोड करून दाखवली तशी आपण आपल्या स्वतःची ताडपट्टी शोधावी व त्यातील जन्मकालीन ग्रहस्थिती वर्णन करून सादर करावी. त्यासाठी आपणांस हैयोंची मदत हवी असेल तर त्यांना आपण विनंती करावी ते शोधकवृत्तीचे समतोल विचारक आहेत असा त्यांचा दावा आहे. म्हणून त्यांच्या सचोटीबाबत आपणल शंका नसावी.

    ही विनंती ज्यांनी नाडीग्रंथांना थोतांड म्हणून लेखन केले आहे यांनाही लागू होते.
    

    मुळीच नाही

    जर शंका आपणांस आहे तर त्याशंकेचे निरसन आपणालाच प्रत्य़क्ष अनुभवाने व नाडीग्रंथांची विविध अंगांनी परीक्षा फावल्या वेळात करायला नको काय?
    नको.
    हे काम आपण टाळण्याने आपणांस शाब्दिक लेखनात फक्त रिता वेळ घालवायचा आहे, असा समज होतो.
    ऍज इफ मी काही हीन कृत्य करतो आहे!
    ३जून१९७९ला बुधवार येतो हे विधान वगळता ज्याअर्थी तशी आपण ती करत नाही त्या अर्थी हैयोंच्या अर्थाची फोड आपणांस मान्य आहे असे मानावे लागेल. पर्यायाने नाडी ग्रंथांच्या पट्यात जन्मदिनांक व त्यावेळची ग्रहस्थिती श्लोकबद्ध असते हे मान्य आहे.
    जातक तेथे जाण्यापूर्वी नाड्या लिहिल्या गेल्या काय हा एक कळीचा मुद्दा आहे.
    बुधवार का मंगळवार याचे विश्लेषण नाडी केंद्रातील तज्ञांकडून केले जाऊ शकते.
    ग्रेगरीचा बाप आला तरी माझी अक्कलच दामटेन.
    दर २८ वर्षांनी तारीख आणि वार यांची जोडी जमते (१८००, १९००, २१००, अशी १०० ने भाग जाणारी पण ४०० ने भाग न जाणारी वर्षे मध्ये पडली नाहीत तर!). २००० ला ४०० ने भाग जातो त्यामुळे २८ चा नियम वापरून मी असे ठासून सांगतो की ६ जून १९८२ रोजी रविवार होता. म्हणूनच ६ जून १९८१ रोजी शनिवार होता, ६ जून १९८० रोजी शुक्रवार होता, ६ जून १९७९ रोजी बुधवार होता (कारण मध्ये २९ फेब्रु १९८० आली), ६ जून १९७८ आणि १९८४ रोजी मंगळवार होते. स्वतःचा जन्मवारही अज्ञात असलेला जातक वापरणारा लेख विश्वासार्ह नाही. गेम ओवर.
    पण त्यासाठी आपणाला पुढाकार घेऊन तुम्हीच तो सोडवला पाहिजेत.
    नाही! नाडीकेंद्राच्या चाहत्यांनी पुढाकार घ्यावा. त्यात त्यांचा फायदा आहे. सरकारने नाडीशास्त्राला मान्यता दिल्यास आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल.
    नाडीवाचकांच्याच्या प्रामाणिकतेची शंका आपणास असेल तर त्यांना भेटून त्यांच्या कडून ती सप्रमाण निरसन करून घ्यायला जे काही करावे लागेल ते आपणासारख्यांनी करायचे आहेत.
    "जे काही" म्हणजे काय? मला सुचलेला मार्ग असा की जातकाने तेथे जाऊ नये, केवळ ठसे पाठवावे.
    अपेक्षा करतो की हैयोंनी जशा काही नाडी पट्ट्यांचा अर्थ सादर करून व त्याची फोड करून दाखवली तशी आपण आपल्या स्वतःची ताडपट्टी शोधावी व त्यातील जन्मकालीन ग्रहस्थिती वर्णन करून सादर करावी.
    मी पट्टी शोधू शकत नाही. जरी तामिळ शिकलो तरी मुळात, ठशांवरून नाडीपर्यंत पोहोचण्याची पद्धत गुप्तच आहे. ती जादू नाडीतज्ञांनाच करावी लागणार. म्हणूनच, तामिळचे भाषांतरही नाडीवाल्यांनीच करावे, भाषांतर हा बॉटलनेक नाहीच मुळी.
    शिवाय, जर पट्टी सापडली नाही तर? मी आधीपासूनच स्वतःला शहाणा समजतो, त्यावर तुमचे प्रमाणपत्र घेण्यात मला रस नाही. विमल जालान, वेणुगोपाल रेड्डी, किंवा सुब्बाराव यांचे प्रमाणपत्र मिळणार आहे काय?

    -

    शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

    नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास

    वाचकमित्रहो, प्रथमत: आपणा सा-यांना दिवाळीनिमित्ते हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांस सुखसमृद्धीची, आनंदाची आणि ज्ञानजिज्ञासेची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नाडिग्रंथ हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते. विविध विषयांच्या अभ्यासकांसाठी नाडिग्रंथांमधील रोचकता ही केवळ भविष्यकथनापुरतीच मर्यादित राहिलेली नसून त्याही पलिकडील अनेक विषयांच्यावर आज चर्चा होतांना दिसते. ह्यात मुख्यत: नाडिग्रंथांतील लिपी, भाषा, उपयोजिलेले काव्यप्रकार अशा; थोडक्यात, ज्योतिषशास्त्राहून भिन्न अशा विषयांवर मोठ्या प्रमाणात अभ्यास होतांना दिसून येतो.

    ह्याच अनुषंगाने जानेवारी २०१० मध्ये पुणे येथे झालेल्या नाडिग्रंथ अधिवेशनामध्ये मी "कूटलिपी - एक विचार" हा नाडिग्रंथांत आढळणा-या लिपीबाबतचा विश्लेषणात्मक शोधनिबंध चर्चेसाठी पाठवून दिला होता. (पूर्वप्रसिद्धी: उपक्रम दिवाळी अंक २००९). ह्या शोधनिबंधावर चर्चा घडल्या, त्याहीनंतर अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून वैयक्तिकरीत्या तसेच जाहिररीत्या प्रश्न केले, ते सारांशात असे: "हैयो, आपण ग्रंथलिपी आणि नाडिग्रंथांतील कूट्टेळुत्तु लिपी ह्यांचा संबंध दाखविणारी शोधनिबंधामध्ये प्रस्तुत केलेली माहिती मोठी रोचक आहे. लिपीशास्त्राभ्यासाच्या निमित्ताने आपण नाडिग्रंथांतील विविध हस्तलिखिते हाताळल्याचे आपल्या विश्लेषणातून कळते. ह्या विषयाबाबतचा आपला दृष्टीकोन हा तटस्थ आहे, प्रामाणिकही वाटतो. तेंव्हा त्या हस्तलिखितांतील मजकूर काही कां असेना, आपण आतांपर्यंत अभ्यास केला त्यात आपणांस काय दृष्टीपथास पडतें, त्याबद्दल सांगा बरें! विंग कमांडर (श्री. शशिकांत ओक) साहेब पट्ट्यांतून जातकाची नांवे, कुंडलीचे वर्णन इत्यादि येते असे ठासून सांगतांत, त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?"

    अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे, हे ध्यानी ठेवून नाडिग्रंथांमध्ये हस्तलिखित ताडपत्रे असल्याने, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र हे दोन विषय नाडिग्रंथांच्या अभ्यासास अपार सहाय्य करू शकतांत असा माझा ठाम विश्वास असून ह्या अनुषंगाने लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे असे मी पूर्वीच सुचविलेले होते.
    नाडिग्रंथांसंबंधी जे अनेक दावे केले जातांत त्यापैकी एक मुख्य दावा म्हणजे त्यांत व्यक्तीचे नांव, जन्मदिनाची नोंद कोरून येणे हा होय. आपल्या विचारप्रक्रीयेस असा दावा निश्चितच चमत्कारिक वाटतो. ह्या प्रकारच्या चमत्कृतिपूर्ण दाव्यांमुळे अनेक वादापवाद आतांपर्यंत उद्भवून गेलेले आहेत. अशामुळे अभ्यासकांच्यामध्ये नाडिग्रंथांवर ’विश्वास ठेवणारे’ आणि ’विश्वास न ठेवणारे’ असे दोन मुख्य गट सिद्ध झाले आहेत. अशा दाव्यांमुळे होते काय, की विविध अभ्यासक विविध प्रकारचे दृष्टीकोन घेऊन नाडिग्रंथावलोकन करताना दिसतात. काहीजण, "चला बघुया कसे काय नांव लिहून येते ते" असा थक्क होण्याचा "विलक्षण थरार" अनुभविण्यासाठी म्हणून ग्रंथावलोकन करावयास जातात, तर इतर काहीजण "धादांत खोटा दावा आहे. अशाप्रकारे माहिती लिहून ठेवलेली असणे अशक्य आहे, चला दाखवतोच मी" अशा आविर्भावामध्ये नाडिवाचकास आणि पर्य्यायाने नाडिग्रंथांस खोटे सिद्ध करण्याकरिता ग्रंथचिकित्सा करावयास जातात.

    नाडिकेंद्रात प्रवेश केल्या केल्या जाम गोंधळलेली - बौचळलेली दिसणारी अशी काही चिकित्सक मंडळी मी स्वत: पाहिली आहेत. तसेही, अ-तमिळ भाषकांस नाडिग्रंथकेंद्रातील वातावरण हे एकुणातच जरासे गूढ वाटणे सहज शक्य आहे. भिंतीएवढ्या आकाराची तमिळ देवदेवतांची आणि ऋषीमहर्षींची प्रकाशचित्रे, नाडिग्रंथ साठवून ठेवण्यासाठीची ती जुनाट लाकडाची कपाटे, त्यातल्या फूटपट्टीच्या आकाराच्या, वर्षानुवर्षे हातही न लागलेल्या वाटणा-या, अत्यंत नाजुक अशा ताडपत्र्या, कायम ’असहकार चळवळ’ पुकारल्याप्रमाणे वागणूक वाटणारे ते नाडिवाचक, त्यांचे तमिळ उच्चाराचा प्रभाव असलेले संभाषण, मुंगळ्यांची रांग चालेलशी दिसणारी त्यातील ती ठसठशीत उठावदार ग्रंथ-वट्टेळुत्तु लिपी, वाचकांचे ते अगम्यसे वाटणारे ग्रंथवाचन, आणि ह्या सा-याच्या उपर आपल्या अनुभवांविषयी विविध दावे करणारे नाडिग्रंथप्रेमी हे सारे एकत्रितरीत्या विचार करता अत्यंत गूढ आणि रहस्यमय वाटत जाते. अर्थात, आपणास ह्या सा-यामागील मुख्य तत्त्वें, त्यातील कारणभाव उमगेल, तर त्यात गूढ असे काहीही नाही हेही लक्षात येईल. तरीही चिकित्सकमंडळी मुख्य तत्त्वें सोडून इतरत्र भरकटत असतात असे मला नेहमी वाटत आलेले आहे. एका नाडिकेंद्रामध्ये वानराच्या अंगठ्याचा ठसा घेवून आलेला एक मनुष्य, त्याची गोष्ट नंतर कधीतरी सांगेन. असो. 

    काही चिकित्सकांच्या अशा अशास्त्रीय दृष्टीकोनामुळे आतांपर्यंतच्या ह्या विषयाच्या प्रवासाकडे एक दृष्टीक्षेप टाकतां, वास्तवापासून दूर आणि तारतम्याचा अभाव असलेली चिकित्सा झाली असल्याचे ध्यानी येते. अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे, हे ध्यानी ठेवून नाडिग्रंथांमध्ये हस्तलिखित ताडपत्रे असल्याने, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र हे दोन विषय नाडिग्रंथांच्या अभ्यासास अपार सहाय्य करू शकतांत असा माझा ठाम विश्वास असून ह्या अनुषंगाने लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे असे मी पूर्वीच सुचविलेले होते. ह्या ग्रंथांतील तमिळभाषा ही संगकाळात वापरली जाणा-या पुरातन भाषेशी जवळीक साधणारी असून, नाडिवाचकांव्यतिरिक्त तिची माहिती असणारे लोक (फार थोडे असले तरीही) अजून आहेत. एक भाषाभ्यासक म्हणून विचार करता, स्वत:लादेखील ह्या भाषेची फोड करणे कठिण नाही असे मला लक्षात येतें आणि त्याप्रमाणे एका स्वतंत्र दृष्टीकोनातून नाडिग्रंथांबद्दल स्वत:स जे काही दृष्टोत्पत्तीस येते, ते प्रामाणिकपणे इतरांसमोर प्रस्तुत करावयाचा हा एक प्रयत्न होय.

    नाडिग्रंथांमध्ये लेखन केलेले असते काय, असल्यास ते कोण्या लिपीमध्ये ह्या स्वत:स पडलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी केलेल्या संशोधनामध्ये मला जे काही आढळले ते मी "कूटलिपी - एक विचार" ह्या शोधनिबंधात स्पष्ट केलेलेच आहे. ह्या शोधनिबंधानंतर आंतरजालावरील उपक्रम, विशेषत: मिसळपावावरील तसेच माहितीतील अनेकांनी स्वत: होवून आपणा स्वत:च्या तसेच आप्तस्वकीयांच्या नाडिग्रंथांवरून लिहून काढलेल्या वह्या मजजवळ (नांवे उघड न करण्याच्या अटींवर) अभ्यासासाठी पाठवून दिल्या. आंतरजालावरील सदस्यांच्या वह्यांची पडताळणी केल्या जावू शकली नाही, परंतु माहितीतील लोकांच्या वह्या ह्या पट्टींतील लेखनावरूनच केलेले आहे, ह्याची पडताळणी केलेली आहे. एकत्रितरीत्या ह्या सा-या व्यक्तींचे नाडिग्रंथावलोकन हे मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूरु, चेन्नै, वैत्तिश्वरन् कोयिल् आणि दक्षिणभारतांतील इतर काही ठिकाणचे, थोडक्यात विविध ठिकाणचे आहे. व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद कोरून येते हे म्हणणे बरोबर आहे काय ह्या प्रश्नाचे सिद्ध उत्तर देण्यासाठी ह्या वह्यांतून मला ह्याबाबतीत काय दिसते ते मी आपणासमोर ठेवू इच्छितो. खरे पाहता तूर्तास नाडिग्रंथलेखनामध्ये आढळणा-या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमानांच्याबद्दलच बोलावें, परंतु प्रश्नाच्या अनुषंगाने व्यक्तीच्या वह्यांमध्ये जन्मविषयक नोंद श्लोकाच्या रूपाने कशी मिळते, त्यांत काय सांगून येते, त्यांतून नाडिवाचक आपणांस आपला जन्मदिनांक कसा सांगतो, त्याबद्दल पाहूया:
    पहिली वही सध्या वयाने साधारणत: तिशीमध्ये असणा-या व्यक्तीची आहे. त्यांत जन्मविषयक नोंद खालील श्लोकाच्या रूपाने येते:


    तमिळ लिपीमध्येदेवनागरीमध्ये लिप्यंतरीत
    மேலான சித்தார்த்தி ஆண்டுத்தோற்றம்
    மாடதுவின் திங்களதில் இருபானீர்தெய்தி
    சாலசெய் வாரமதில் சித்திரைவின்மீன்
    சாற்றரவி மையின்மேல் கவிசேயுள்ளே
    உள்ளதன்பின் ரவியேர் மாலும்யாழில்
    உயர்மன்னன் வயலதுவில் கரிராவேங்கை
    கள்ளமிலா மதிமங்கை சிகிகலசம்   
    मेलाऩ सित्तार्त्ति आण्डुत्तोट्रम्
    माडदुविऩ् तिङ्गळदिल् इरुबाऩीर्तॆय्ति
    सालसॆय् वारमदिल् सित्तिरैविऩ्मीऩ्
    साट्ररवि मैयिऩ्मेल् कविसेयुळ्ळे
    उळ्ळदऩ्पिऩ् रवियेर् मालुम्याऴिल्
    उयर्मऩ्ऩऩ् वयलदुविल् करिरावेङ्गै
    कळ्ळमिला मदिमङ्गै सिगिहलसम्

    ह्या श्लोकातील पहिल्या दोन ओळींचा अर्थ: ह्या व्यक्तीचा जन्म सिद्धार्थी (तमिळ उचार ’सित्तार्त्ति’) संवत्सरात रवी वृषभाच्या (माडदुविल्) महिन्यात असतांना तमिळ पंचांगाप्रमाणे २२ व्या तिथीवर मंगळवारी झाला. एवढ्याश्या माहितीवरून नाडिवाचकास आपला जन्मदिनांक प्रचलित पद्धतीप्रमाणे आंग्लभाषेमध्ये सांगण्यासाठी गणित घालणे आवश्यक असते. ह्यासाठी भारतीय कालमापनपद्धतीचा सखोल अभ्यास असणे अत्यावश्यक होय. नाडिग्रंथांतील श्लोकांमधून व्यक्तीच्या जन्माशी निगडीत दिनांकाची मांडणी ही नेहमी संवत्सर / मास / दिन अशा क्रमपद्धतीने समोर येते. ग्रंथांतील संवत्सराचे नांव हे तमिळभाषक लोकांच्या ६० वर्षांच्या तमिळ दिनदर्शिकेप्रमाणे नोंदविलेले आढळते. अभ्यासकांच्या मते अत्यंत अचूक अशी ही दिनदर्शिका असून तीत संवत्सरांची नांवे आणि त्यांचा क्रम हा ठरलेला असतो. अशा ह्या तमिळ दिनदर्शिकेप्रमाणे सित्तार्त्ति म्हणजे एप्रिल १९७९ ते मार्च १९८० होय. एवढ्या ह्या माहितीवरून व्यक्तीच्या जन्मवर्षाची साधारण कल्पना आपणास येते. येथून पुढे सूर्य कोण्या महिन्यात कोण्या राशीत प्रवेश करतो हीही माहिती ठेवणे आपणास आवश्यक ठरेल. साधारणत: १५ मे च्या सुमरास सूर्य वृषभराशीमध्ये प्रवेश करतो असे धरून, १५ मे पासून पुढे २२ दिवस मोजणे आतां आपणास आवश्यक आहे. हे मोजून येतो तो दिनांक म्हणजे ६ जून होय. थोडक्यात, ६ जून १९७९ हा दिनांक आपणास मिळाला.
    खरेतर, तमिळ दिनदर्शिकेनुसार वरील श्लोकांत उल्लेखलेले सिद्धार्थी वर्ष हे १९७९-१९८० पूर्वी १९१९-१९२० मध्येही येवून गेलेले आहे, आणि ह्यानंतरही ते २०३९-२०४० मध्ये येणार आहे. अशावेळी, जातकाचा जन्म १९७९-१९८० मध्येच झाला हे नाडिवाचक कसेकाय सांगेल? अर्थात, समोर बसलेल्या जातकाकडे बघून तो वयाने तिशीतील आहे हे नाडिवाचकास नक्कीच कळू शकेल; तरीही, नाडिग्रंथांतून वाचून नाडिवाचक जे काही सांगतो आहे, त्याची खात्री जातकाने कशी पटवून घ्यावी? ही खात्री पटण्यासाठी नाडिग्रंथलेखकाने पडताळणीची सोय करून ठेवलेली असल्याचे आपणास क्रमश: येणा-या श्लोकांमधून कळते. पुढील श्लोकांमध्ये सिद्धार्थी नामक त्या विवक्षित संवत्सरामध्ये सूर्य वैशाख महिन्यात प्रवेशून २२ वी तिथी असतांना मंगळवारी अवकाशामध्ये जी काही ग्रहस्थिती होणार असेल, तिची नोंद नाडिग्रंथलेखकाने आपणासाठी आगावूमध्येच करून ठेवल्याचे सांगितले जाते. वरील श्लोकांत ही नोंद पुढीलप्रमाणे आलेली आहे: नक्षत्र चित्रेत, मेष लग्नामध्ये शुक्र आणि मंगळ (मैयिन्मेल् कवि सॆय्); त्याच्यापुढे रवि (अदऩ्पिऩ् रवि); मिथुनेत बुध (मालुम्याऴिल्); कर्केत गुरु (उयर्मऩ्ऩऩ् वयलदुविल्); सिंहेत राहू आणि शनि (करिरावेङ्गै) कन्येत चंद्र (मदिमङ्गै); कुंभेत केतु (सिगिहलसम्). ही ग्रहस्थिती ६ जून १९१९ मध्येही येणार नाही, अन् ६ जून २०३९ मध्येही येणार नाही. १९७९ मध्ये जून महिन्यातील ६ व्या दिवशी असलेली ही ग्रहस्थिती ही खरेतर त्या दिनी जन्मलेल्या जातकाच्या आयुष्याला ’साक्ष’ देणारी ग्रहस्थिती आहे असे वर्णन नाडिग्रंथांतून येते, तर हीच तुमची पत्रिका होय असे प्रचलित भाषेमध्ये त्या जातकास सांगितले जाते. साध्या भाषेत सांगावयाचे झाल्यास, "तुमचा जन्म ६ जून १९७९ चा आहे" एवढेच जातकास सांगितले जाते. असो. आतां येथून पुढे वाचकांच्या अभ्यासार्थ संक्षेपामध्ये दोन श्लोक देतो आहे. उपरोक्त श्लोकाच्या विवेचनामध्ये दिलेल्या माहितीवरून वाचक स्वत: प्रयत्न करून पुढील श्लोकांची पडताळणी करू शकतील, आणि तशी त्यांनी स्वत: श्लोकांची पडताळणी करून पहावी ही अपेक्षा आहे.

    दोन जुळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी एकेकट्याने जावून नाडिग्रंथावलोकन केले होते. त्यांच्या पट्टींमध्ये त्यांच्या जुळेपणाबद्दल उल्लेख येतांना काय प्रकारची शब्दयोजना केली जाते, हे बघूया. त्यापैकी लहान असलेल्या भावंडाच्या वहीमध्ये खालीलप्रमाणे श्लोक येतो:


    तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत


    சித்தார்த்தியிலே கடைதிங்கள் தசமோடொன்று
    அறியமதி நாள்தானே ஆதிரைமீனும்
    வாதிரைமீனும் மதியாழில் சிகிமால்கலசம்
    கலசம்மேல் ரவிமீனில் சுங்கன்வருடை
    கூறாத மற்றகோட்கள் வேங்கையில்காணும்
    सित्तार्त्तियिले कडैतिङ्गळ् तसमोडॊऩ्ऱु
    अऱियमदि नाळ्दाऩे आदिरैमीऩुम्
    वादिरैमीनुम् मदियाळिल् सिहिमालकलसम्
    कलसम्मेल् रविमीनिल् सुङ्गऩ्वरुडै
    कूर्राद मऱ्ऱहोट्कळ् वेङ्गैयिल्काणुम्


    या व्यक्तीचा जन्म - सिद्धार्थी नामक संवत्सरात (१९७९-८० मध्ये) शेवटच्या (कडै) म्हणजे फाल्गुन महिन्यात, तमिळ पंचांगाप्रमाणे (तसमोडॊऩ्ऱु) ११ व्या तिथिवर सोमवारी (अऱियमदिनाळ्) झाला. पुढे ग्रहस्थिती देतांना आर्द्रा नक्षत्र (वादिरैमीनुम्), चंद्र मिथुनेत, (मदियाळिल्) केतु आणि बुध कुंभेत (सिहिमालकलसम्), कुंभेच्या पुढे मीनेत रवी (कलसम्मेल् रविमीनिल्), शुक्र मेषेत (सुङ्गऩ्वरुडै), न सांगितलेले इतर सारे ग्रह सिंहेत (कूर्राद मऱ्ऱहोट्कळ् वेङ्गैयिल्काणुम्) - म्हणजे राहु, शनि, गुरु, मंगळ अशाप्रकारची शब्दयोजना आहे. साध्या भाषेत, या व्यक्तीचा जन्म २४ मार्च १९८० चा आहे असा अर्थ निघतो. ह्या व्यक्तीने एकट्याने जावून मुंबईमध्ये जुलै २०१० मध्ये नाडिग्रंथावलोकन केले होते. त्याहीपूर्वी तिच्या जुळ्या भावंडाने एकट्याने दिल्लीमध्ये मार्च २०१० मध्ये नाडिग्रंथावलोकन केले, त्यातील जन्मविषयक माहिती देणारा श्लोक खालीलप्रमाणे:


    तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत


    யிவளுதிக்க சித்தார்த்தி பங்குனித்திங்கள்
    வரும்திகதி யிலாபமதே சோமன்வாரம்
    வாதிரைமீனில் மதிதண்டில் சிகிமால்கூனில்
    கூனின்மேல் யிரவிமச்சம் சுங்கன்வருடை
    கூடியிருக்க மற்றகோள் வேங்கைதன்னில்
    यिवळुदिक्क सित्तार्त्ति पङ्गुऩित्तिङ्गळ्
    वरुम्तिगदि यिलाबमदे सोमऩ्वारम्
    वादिरैमीऩिल् मदिदण्डिल् सिहिमाल्गूऩिल्
    कूऩिऩ्मेल् यिरविमच्चम् सुङ्गऩ्वरुडै
    कूडियिरुक्क मऱ्ऱकोळ् वेङ्गैतऩ्ऩिल्

    ह्याही व्यक्तीचा जन्म, २४ मार्च १९८० लाच झाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, ह्या दोन्हीही व्यक्ती भिन्न असल्या तरी (जुळ्या असल्यामुळे) त्यांच्या श्लोकांतून मांडलेली ग्रहस्थिती एकच होय. सर्वसाधारणत: महाराष्ट्रीय अथवा दाक्षिणात्य पद्धतीने ह्या व्यक्तींची कुंडली मांडली असतां ग्रहस्थिती एकच असल्याने दृक् रूप कुंडली एकसारखीच दिसावी. (चूकभूल देणेघेणे - मी ज्योतिषाभ्यासक नाही!) तर दोन वेगवेगळ्या ह्या पट्टीतील व्यक्तींच्या बाबतीत येणा-या एकाच ग्रहस्थितीबद्दल शब्दयोजना ही भिन्न भिन्न पद्धतीने समोर येते. जन्ममहिन्याच्या बाबतीत एके ठिकाणी ’फाल्गुन’ (पङ्गुनि) असा उल्लेख असून दुसरे ठिकाणी शेवटचा महिना (कडैत्तिङ्गळ्) अशा शब्दरचनेने तोच महिना दर्शवला आहे. त्याचप्रमाणे जन्मतिथीही दोन वेगळ्या शब्दांनी (यिलाबम् तथा तसमोडॊऩ्ऱु; दोन्हीचा अर्थ ११) दर्शविली आहे. पुढे जन्मवारही दोन वेगळ्या शब्दांनी (अऱियमदिनाळ् तथा सोमन्वारम्) दर्शविला गेला आहे.

    श्लोकांमध्ये ग्रहस्थिती देतांना आर्द्रा नक्षत्रासाठी दोन्हीही ठिकाणी एकच शब्द उपयोजिला आहे (आदिरैमीऩ). चंद्र मिथुन राशीत असल्याची स्थिती दोन्हीकडे वेगवेगळ्या शब्दांनी दर्शविली आहे (मदिदण्डिल् आणि मदियाळिल्). केतु आणि बुध कुंभ राशीत असे सांगतांना एके ठिकाणी ’सिहिमाल्गूऩिल्’ अशी शब्दयोजना आहे, तर दुसरे ठिकाणी ’सिहिमालकलसम्’ असे म्हटल्या गेले आहे. रवी मीन राशीत म्हणण्यासाठी दोन्हीकडे ’यिरविमच्चम्’ आणि ’रविमीनिल्’ अशी वेगवेगळी शब्दयोजना आहे तर शुक्र मेष राशीत असे सांगण्यासाठी मात्र दोन्हीकडे ’सुङ्गऩ्वरुडै’ असे म्हटले आहे. दोन्ही श्लोकांतील साम्यवैशिष्ट्य ते असे की दोन्ही श्लोकांमध्ये राहु, शनि, गुरु, मंगळ ह्या ग्रहांचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. दोन्हीही व्यक्तींच्या वहीमध्ये हा जातक जुळ्या भावंडांपैकी एक आहे असा उल्लेख नंतरच्या वर्णनातून केला जातो. त्यातही मोठे कोण, लहान कोण इत्यादि उल्लेख बारकाईने नोंदलेला आढळतो. जिच्या वहीमध्ये ’ही धाकटी आहे’ असा उल्लेख आहे, त्या व्यक्तीने स्वत:च्या मातोश्रींस विचारून घेवून खात्री करून घेतल्यानंतर आधीच्या व्यक्तीच्या जन्मानंतर ११ मिनिटांनी आपला जन्म झाला असल्याचे लक्षात आल्याचे कळवले आहे. असो.

    माझ्या माहितीतील, राजकीय वर्तुळातील भारदस्त अशा एका व्यक्तिमत्त्वाच्या वहीमध्ये खालील श्लोक येतो


    तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत
    இவளாண்டு ஹேவிளம்பி பங்குனியதில்
    இருபானார் திகதியுடன் சேயின்வாரம்
    ஆவிசாபம் கரிவருமே சேய்மகரம்
    மகரமீரதில் சுங்கனும் ரவிசேவில்
    மால்ஞானி மேடம் அரவேந்தன்துளை
    ஆகபின் சந்திரனும் தேளதுவில்
    इवळाण्डु हेविळम्बि पङ्गुऩियदिल्
    इरुबाऩार् तिगदियुडऩ् चेयिऩ्वारम्
    आविसाबम् करिवरुमे सेयमहरम्
    मगरमीरदिल् सुङ्गऩुम् रविसेविल्
    माल्ञाऩि मेडम् अरवेन्दऩ्दुळै
    आहपिऩ् सन्दिरऩुम् तेळदुविल्

    हेविळम्बि संवत्सर, फाल्गुनमास, २६वी तिथी, मंगळवार, धनुलग्नी शनि, मंगळ मकरेत, शुक्र कुंभेत, रवी मीनेत, बुध+केतु मेषेत, राहू+गुरु तुळेत, चंद्र वृश्चिकेत. साध्या भाषेत ०८ एप्रिल १९५८.

    नाडिग्रंथसाहित्यातून खरोखरीच व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद येते काय असे विचारणा-या अभ्यासकांसाठी वरील विवेचनाची झलक प्रेरणादायी ठरावे असे वाटते. गेल्या वर्षभरात सुमार शेकड्याने वह्या आणि ग्रंथपट्ट्या माझ्या नजरेखालून गेल्या असाव्यात, जागाभयास्तव त्या सा-यांतील केवळ ४च श्लोक येथे प्रातिनिधीक म्हणून दिले आहेत. अर्थात, केवळ ४ श्लोकांमध्ये संपणारा हा विषय खचितच नव्हे. खरेतर ह्यामध्ये अजूनही केवढेतरी लिहावयाचे उर्वरित आहे. मूळ मुद्दा मांडावयाचा तो असा, की नाडिग्रंथांमधून जन्मरास आणि लग्नरास "लिहिलेली असते" अथवा "लिहिलेली नसते" असा कोणत्याही प्रकारचा दावा ठोकण्याआधी स्वत:च्या अनुभवावर आधारीत दाव्याची भाषाशास्त्रीयदृष्ट्या खात्री करून घ्यावी. बाजारांत मिळणारी तमिळभाषाशास्त्रविषयक शब्दकोश तथा पुस्तके ह्यासाठी नक्कीच उपयोगांत आणतां येतील.

    जातां जातां, फलज्योतिषाभ्यासकांसाठी मजजवळ एक प्रश्न आहे. पारंपारिक पद्धतीने कुंडली मांडतांना जन्मवेळेसह जन्मठिकाणाची आवश्यकता असते असे फलज्योतिषाभ्यासक लिहून ठेवतांत. नाडिग्रंथांवरील माझ्या आतांपर्यंतच्या अभ्यासामध्ये कोणाच्याही नाडिग्रंथपट्टीमध्ये जन्मवेळ आणि जन्मठिकाण नोंदविलेले आढळलेले नाही. असे असूनदेखील ’जन्मविषयक इतर माहिती अत्यंत अचूकरीत्या नोंदविली जाते’ असा दावा नाडिग्रंथप्रेमी आणि नाडिवाचकांकडून केला जातो. हे कसेकाय शक्य होते ह्या विषयावर ज्योतिषशास्त्राभ्यासकांनी विचार करावा, चिकित्सकांनी चिकित्सा करावी. असो.

    एकुणात काय, तर पूर्वी म्हटल्याप्रमाणे ह्या विषयातील चमत्कृती आणि दाव्यांस बाजूस ठेवून तीमागील मीमांसा सर्वांगाने अभ्यासिली जाण्यास हवी; जेणेकरून वास्तवाचा अभ्यास होवून सत्यता काय आहे हे आपोआप स्पष्ट होईल. ह्याने अनेक अनुत्तरीत गूढ अशा प्रश्नांची उकलही होईल आणि दाव्यांबाबतच्या सत्यासत्यतेविषयी ठाम निष्कर्षासही येतां येईल.

    ------

    लेखक: हैयो हैयैयो, मुंबई उच्च न्यायालय येथे अभ्यसनक अधिवक्ता म्हणून कार्यरत. न्यायशास्त्राभ्यासक. समाजशास्त्राभ्यासाची आवड. विविध भाषांचे भाषाशास्त्र तथा लिपीशास्त्रावर २० वर्षांहून अधिक काळ अभ्यास. स्वतःच्या आवडीच्या विषयांवर मराठी, तमिळ, इंग्रजी इत्यादि भाषांमधून लेखन. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांमधील एक 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' ह्याही तत्त्वाचा खंदा समर्थक.

    संपर्क: haiyohaiyaiyo@gmail.com

    -