Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

सोमवार, ३ डिसेंबर, २०१२

'नाडी ग्रंथांनी तुम्हाला काय दिले? शशिकांत ओक श्री. चडचणकरांची मुलाकत घेताना


कार्यशाळा 2013 मधील एक प्रांजळ मुलाखत

शशिकांत ओक श्री. चडचणकरांची मुलाकत घेताना म्हणतात, 'नाडी ग्रंथांनी तुम्हाला काय दिले? असे विचारले तर पटकन उत्तर देणे शक्य होत नाही. पण श्री. चडचणकांनी दिलेले यावरचे उत्तर समर्पक व प्रतिनिधिक स्वरूपाचे होते.  ते म्हणाले की त्या मंदिरांच्या वातावरणात मनाला अत्यंत आनंद व मानसिक समाधान लाभले. असे ते फोन वरून बोलताना म्हणाले होते. याचा आवर्जून उल्ळेख केला होता. ते म्हणतात,  मला कर्मधर्म संयोगाने श्री जाजू म्हणून स्नेही नवग्रहयात्रेला सोबत म्हणून मिळाले. पण असे अनेक नाडीप्रेमी आहेत की त्यांना नवग्रह मंदिरांना भेटी द्यायची फार इच्छा असते. घरच्या नातलगांसाठी शांती दीक्षा करायची असते पण दूरचा प्रवास, भाषेची अडचण  व योग्य सोबत नसल्याने त्यांचा विरस होतो. अशांसाठी काही यात्रा कंपन्यांनी पुढाकार घेतला तर चांगले होईल. ओकांनी म्हटले की आणखी एक नमूद करावेसे वाटते. अने्कना नाडी म्हटले की तिटकारा वाटतो. काहींना ओकांचे चऱ्हाट वाटते तर काहींना मेजवानी वाटते एक वाचक म्हणून श्री. चडचणकर म्हणतात  कि या विषयातील सर्व माहिती ते रस शोषून घेतल्या प्रमाणे ते वाचन करतात.





Part1. Pt. Madan Mojhan ji Mogawale Bhrugu Wachak


पं मदन मोहन जी मोगावाले भृगु वाचक नाम से प्रसिद्ध हैं। दि. 27 दिसंबर 2012 को जलंधर के उनके दरबार में विंग कमांडर शशिकांत ओक द्वारा भृगु तथा शुक्र महर्षी गुरुकुल में आचार्यों के साथ फलादेश पर चर्चा करते हुए बनाया गया चित्र भेंट किया गया।

सोमवार, १६ जुलै, २०१२

टोकाचा "प्रत्यक्ष-बघा"-वाद दिसतो आहे.

धनंजयचे प्रश्न आणि माझी -हैयोयैयोंची- उत्तरे






Inbox
X





Reply
|
हैयोहैयैयो
show details 4 Sep
लेखक: धनंजय, शुक्र, 09/04/2009 - 15:45
हा जरा कठिण प्रकार दिसतो. उत्तरे घाटपांडे देतील, पण हा थोडा वेगळा विषय आहे, म्हणून वेगळे विचारतो आहे.

> आपले चिकित्साकार्य हे शास्त्रीय असल्याचे सिद्ध झालेच तर ...
"अमुक" चिकित्सा शास्त्रीय आहे, याची कुठली सिद्धता तुम्हाला मान्य आहे? कदाचित तसे शब्दांकन कठिण असेल, पण अधिक सार्वत्रिक असे कुठले उदाहरण देऊ शकाल का? ("सार्वत्रिक" म्हणजे वेगवेगळ्या देशांतही सहज सापडू शकेल असे कुठलेसे चिकित्साकार्य, जे तुमच्या मते शास्त्रीय आहे. आणि त्या उदाहरणाचे विवेचन करून सिद्धता समजावून सांगावी.)
तुमच्या लेखनात कुठलातरी टोकाचा "प्रत्यक्ष-बघा"-वाद दिसतो आहे.
भारतीय न्यायशास्त्रात (गौतम ऋषींच्या - ज्याला आपण आजकाल "लॉजिक" म्हणू), तसेच वेगवेगळ्या देशांतल्या लोकांनीही प्रमाणांबद्दल चर्चा केलेली आहे. प्रत्यक्ष (स्वानुभव)/अनुमान (डिडक्टिव, इंडक्टिव लॉजिक)/उपमान (इंडक्टिव लॉजिक आणि ऍनॅलॉजी)/शब्द (विटनेस) या वेगवेगळ्या प्रमाणांबद्दल चर्चा झालेली आहे.
"अनुमान" हे प्रमाण तुम्हाला मान्य नाही काय? अनुमानाचे प्रमाणत्व मान्य केले नाही तर त्याचे तोटे शंकराचार्यापासून हल्लीच्या लोकांपर्यंत कित्येकांनी विवरण करून सांगितले आहेत. मला तरी "अनुमान" या प्रमाणाचा उपयोग झालेला आहे, आणि ते नसते तर माझा रोजचा व्यवहारच कुंठित झाला असता. (म्हणजे खोलीत थोडासा उजेड दिसू लागला, म्हणजे सकाळ बरीच झाली आहे, असे अनुमान प्रमाण मानून मी ताडकन उठतो. माझ्या बिछान्यावर थेट सूर्य येत नाही - म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदर्शन कधीच होत नाही. तसे प्रत्यक्ष सूर्यदर्शन झाल्याशिवाय, "उजेड->सूर्योदय" असे अमान्य केल्यास माझे वेळेवर बिछान्यातून उठणे बिघडेल. दिवसभरात असे आडथळे पदोपदी येतील!)
प्रयोगशाळेतल्या संशोधनात तरी असे काही तत्त्व आहे : "तुल्यबल अनुमानांमध्ये विरोध असला, तर प्रत्यक्ष हेच प्रमाण त्या दोहोंपैकी योग्य अनुमानपद्धती सांगते." अहो, प्रत्येक प्रात्यक्षिक प्रयोगाचा पैशाच्या आणि मनुष्यबळाच्या दृष्टीने मोठा खर्च असतो. म्हणून अनुमाने साशंक असली तरच प्रात्यक्षिक करण्यास अनुदान मिळते. नाहीतर कुठलाही शोध पुढे सरणारच नाही. कारण एखादा प्रयोग पुन्हापुन्हा केल्यानंतरही, जगातील प्रत्येक प्रश्नकर्त्याला प्रयोगशाळेत आणून तोच तो प्रयोग पुन्हा करावा लागेल. (कारण त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय निष्कर्ष त्यांना अमान्य आहे!)
अनुमान प्रमाण म्हणून अमान्य केल्यास असे भयंकर तोटे होतात असे तुम्हाला पटत नाही का?
----------------

नमस्कार,

समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास हा प्रकार अजिबात कठीण नाही.

> "अमुक" चिकित्सा शास्त्रीय आहे, याची कुठली सिद्धता तुम्हाला मान्य आहे?

ह्या प्रश्नाचे उत्तर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून द्यावयाचे झाल्यास, जोपर्यंत त्रुटी आढळतात तोपर्यंत चिकित्सापूर्ति झाली असे मला सामान्यतः वाटत नाही. एखाद्या शास्त्रीय सिद्धांतात आपणांस त्रुटी आढळल्या, तर आपण तो शास्त्रीय सिद्धांत मान्य कराल काय? त्या विषयाचा सर्वांगपरिपूर्ण अभ्यास केला गेल्याशिवाय तो त्रुटीपूर्ण सिद्धांत मान्य करणे कोणत्या शास्त्रीय निकषांस मान्य आहे ह्याचे आणि त्या उदाहरणाचे विवेचन करून सिद्धता समजावून सांगावी.

> तुमच्या लेखनात कुठलातरी टोकाचा "प्रत्यक्ष-बघा"-वाद दिसतो आहे.

येथे काही वाद आहे असे मला वाटत नाही, आणि वाद असलाच, तर तो टोकाचा नाही. आपण ज्याला 'वाद' असे म्हणतां त्याला मी 'आग्रह' असे म्हणतो. चिकित्साशास्त्र प्रत्यक्ष अनुभूतिस अमान्य करते असे आपले म्हणणे आहे काय?

येथे एक प्रश्न आपणाकरिता : लेखकाची मते वैयक्तिक असती तर आपणांस आपण म्हणतां तसे वाटले असते काय? येथे अनेक सदस्यांनी आपापली वैयक्तिक मते मांडली आहेत, आणि मी त्यांच्या त्या वैयक्तिक मतांबद्दल एक चकार शब्ददेखील बोललेलो नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. प्रत्येक मनुष्याची सर्वच्या सर्व मते एकसारखी असणे शक्य नाही हा सिद्धांत मी जाणून आहे.

>"अनुमान" हे प्रमाण तुम्हाला मान्य नाही काय?

ह्याचे उत्तर 'मान्य आहे' असे आहे. अनुमानास प्रमाण म्हणून अमान्य केल्यास भयंकर तोटे होऊ शकतात ह्याबद्दल कोणाचे दुमत असू नये. परंतु हे प्रमाण सर्वसकट लागू करतांना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एका गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, प्रयोगशाळेतली तत्त्वे ही प्रयोगशाळेबाहेर (विशेषत: समाजशास्त्रात) सर्वसकटरित्या लागू होत नाहीत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून (आठवा : जनहितार्थ) चिकित्सा करताना समाजशास्त्रीय तत्त्वे विचारात घेणे अधिक सयुक्तिक ठरते. असो.

जोपर्यंत आपले सिद्धांत त्रुटीपूर्ण आहेत, तोपर्यंत ते सर्वमान्य होणे शक्य नाही हे लक्षात घेवून आपल्या वैयक्तिक अनुमानास 'चिकित्सा' अथवा 'सिद्धांत' असे शब्दप्रयोग करून संपूर्ण समाजावर आग्रही रीतिने लादणे हे योग्य नव्हे. आपल्या सिद्धांतातल्या त्रुटी जर कोणी दाखवून दिल्या, तर पलायनवाद स्वीकारणे हेही योग्य नव्हे. आपल्या मतांमध्ये-सिद्धांतांमध्ये कमतरता असेल, आणि जर कोणी तसे दाखवून दिले, तर लेखकाने ते प्रांजलपणे मान्य केलेच पाहिजे, कारण चिकित्सा ही आग्रही नसते. येथे तर मला केवळ दुराग्रह दिसतो आहे. आपण पाहिलेच असेल माझ्या प्रश्नांकडे कसे चक्कन् दुर्लक्ष करण्यात आले होते ते!

असो. लेखकाने 'नाडिशास्त्र थोतांड आहे' हे आपले वैयक्तिक मत आहे असे प्रतिपादन केले असते तर त्यांचे मत विचारात घेण्याचे काहीएक कारण नव्हते. परंतु 'चिकित्सा' हा शब्दप्रयोग आणि पुस्तक लिहिणे - मते मांडणे - नारळीकरांसारख्या मान्यवरास बोलावून परिक्षण लिहून घेणे असे कर्म ह्यामुळे चिकित्सेवर चिकित्साविचार करणे भाग पडते.

मला एक विशेष आश्चर्य राहून राहून वाटते ते असे, की नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाला सुद्धा मला पडतात तसे साधेसरळ प्रश्न पडले नसतील काय? अर्थात, आपणांस पडद्यामागच्या हालचालींचा नुसता वेधच घेता येतो! पण प्रत्यक्षात दिसतात त्या गोष्टीही काही कमी बोलत नाहीत!!!

Thanks,

हैयोहैयैयो सांगतायत - कूटलिपी म्हणजे काय?

कूटलिपी म्हणजे काय?

. आरंभ - सत्यशोधनासाठी अभ्यासाची आवश्यकता
. पूर्वपीठिका - स्त्रोत
. ग्रंथलिपी म्हणजे काय - एक ओळख
. ग्रंथलिपीचा उपयोग आणि भिन्न रुपे
. नाडीपट्टींमध्ये आढळणारी लेखनशैली
. कूटलिपी कां म्हणतांत? शब्दार्थ
. कूट्टेळुत्तु - तमिळ शब्दार्थ - युक्ताक्षरे ही संकल्पना - नाडीग्रंथांच्या संदर्भातील कूट्टेळुत्तु चे स्थान.
. तात्पर्य आणि पुढील संशोधनाची आवश्यकता

1. नाडिग्रंथ-नाडिपट्टीआधारे भविष्यकथन करण्याच्या प्रकारामध्ये "जातकाकडूनच विविध मार्गांनी माहिती काढून, आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन, तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो" असा एक संशय नेहमी घेतला जातो. ह्या संशयाचे निराकरण करण्याकरता काही बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे, जेणेकरून सत्यता काय आहे हे स्पष्ट होईल. ह्यासाठी सर्वप्रथम नाडीग्रंथांमधील लेखनाची तपासणी करणे आवश्यक ठरते. स्वत: नाडिवाचक असे सांगतात की नाडिपट्टींमध्ये जातकाच्या भविष्याचे लेखन केलेले असते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे लेखन तमिळ भाषेत, ’कूटलिपीमध्ये असते. तर हीकूटलिपीम्हणजे ह्या विषयाच्या अभ्यासामधील एकअडथळाआहे असे अभ्यासकांकडून बहुधा सांगितले जाते. ह्या विषयावर - पर्यायाने, खरोखरीच काही लेखन केलेले असते काय - ह्यावर अधिक अभ्यास करणे आणि सत्याचा शोध घेणे हे नाडिग्रंथ-नाडिपट्टी-नाडिभविष्य ह्यांबाबत काही मते बनविण्यापूर्वी अत्यंत आवश्यक ठरते.

2. माझा स्वत:चा ब्राह्मी जनित - अरबी जनित - आणि अन्य जवळपास ७० लिपींचा तसेच लिपीशास्त्राचा अभ्यास आहे. लिपीशास्त्राभ्यासासाठी एक जिज्ञासा म्हणून काही निमित्ताने नाडिपट्टीची काही चित्रे आंतरजालावर शोधली आणि त्यातील लिपीबद्दल शोध घेतला. ह्यानंतर काही तमिळभाषक स्नेह्यांच्या ओळखीने काही नाडिवाचकांशी चर्चा करण्याचा योग आला. अनेक पट्टी बघण्याचा आणि हाताळण्याचा योगही आला. ’भविष्यह्या शब्दास सर्वस्वी दूर ठेवून वस्तुनिष्ठ पद्धतीने केवळ लिपीचा अभ्यास करताना असे लक्षात आले की जिलाकूटलिपीअसे म्हटले जाते आहे, ती वास्तविक पाहता ग्रंथलिपी नामक एक प्राचीन लिपी आहे.

3. ग्रंथलिपि (तमिळ भाषेत: கிரந்த ௭ழுத்து) ही दक्षिण भारतात पुरातनकाळापासून प्रचलित असलेली प्राचीन आणि महत्त्वपूर्ण अशी एक लिपी आहे. सामान्यत: हिची उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासून झाली असल्याचे विद्वानांचे सर्वमान्य मत आहे. आधुनिक काळातील सर्व दक्षिण भारतीय भाषांच्या स्वतंत्र लिपींवर तसेच सिंहल लिपी, पल्लव लिपी, मोन लिपि, जावा लिपी, ख्मेर लिपी ह्या आणि अशा अनेक लिपींवर ह्या ग्रंथलिपीचा बराच सखोल प्रभाव दिसून येतो. ह्या अनेक लिपींचा उगम हा ग्रंथलिपीमध्येच आहे असेही लिपीशास्त्राभ्यासकांचे सर्वमान्य मत आहे.

4. संस्कृत साहित्यलेखन करण्यासाठी देवनगारी लिपीचा उपयोग होण्यापूर्वी ग्रंथलिपीचा उपयोग होत असे. दक्षिण आशियाई तमिळभाषी क्षेत्रांमध्ये जवळजवळ १९ व्या शतकापर्यंत संस्कृत भाषेत साहित्यलेखन करण्यासाठी ग्रंथलिपीचा उपयोग होत आलेला आहे. विद्वानांच्या मतानुसार ही लिपी ..पूर्व २०० पासून वेगवेगळ्या रूपामध्ये अस्तित्त्वात आहे.

ग्रंथलिपीची भिन्नभिन्न काही रूपे आहेत. ही भिन्नरूपे साधारणत: दोन मुख्य वर्गांमध्ये वर्गीकृत करण्यात आलेली आहेत.



सुदैवाने ह्यापैकी अनेक रूपे आपणास दक्षिणभारतातील मंदिरांमध्ये भित्तीलेखनाच्या स्वरूपात आजही आढळतात. मैसूरु विश्वविद्यानिलय प्राच्यविद्यासंशोधनालयाने ग्रंथलिपीवर बरेच संशोधन केलेले आहे. प्राच्यविद्यासंशोधनालयाने काही दशकांपूर्वी ग्रंथलिपीचा विकास होतानाची जी अनेक रूपे आहेत तिचा एक तौलनिकदृष्ट्या अभ्यास विस्तृत निबंधरूपाने उपलब्ध करून दिला होता. ही सारी रूपे प्रथमदर्शनी एकमेकांपासून भिन्न जरी दिसत असली, तरीही सर्वसामान्यपणे ह्यास ग्रंथलिपी हेच संबोधन आहे. (जसे देवनागरी लिपीचीही विकसनकालातील अनेक विविध रूपे असूनदेखील सर्वसामान्यपणे त्यांनादेवनागरी लिपीअसेच म्हटले जाते.)

5. नाडीपट्टींमध्ये आढळणारी ग्रंथलिपीची स्वत:ची विशिष्ट अशी एक शैली आहे. मूळ ग्रंथलिपी ही देवनागरी लिपीप्रमाणे तीन मजली लिपी आहे, तर नाडीपट्टीमध्ये ती दोन मजली असल्याचे आढळते. ह्यासह, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शीघ्रगतीने लेखन करणे सुलभ व्हावे म्हणून बाळबोध लिपीची अक्षरे हात उचलता लिहिली जात असत (मोडी लिपी) त्याचप्रमाणे नाडिपट्टींमधील लेखन शीघ्रगतीने व्हावे यासाठी हात उचलता ग्रंथ लिपीत लिहिण्याची शैली विकसीत केली गेली आहे. असे करत असताना मात्र मूळ ग्रंथलिपीचे आघात (स्ट्रोक्स) हे थोडेअधिक प्रमाणात बदलले जातात, त्यामुळे सामान्य अभ्यासकास ही लिपी प्रथमदर्शनी ग्रंथलिपी वाटण्याचा संभव आहे. तसेही ही लिपी ग्रंथलिपी वाटण्याची दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे, ग्रंथलिपीचे प्रमाणीकरण होण्यापूर्वीची भिन्नरूपे त्यांच्याशी परिचय नसणे, आणि दुसरे म्हणजे हात उचलता लिहिण्याच्या शैलीमुळे ही लिपी थोडी दुर्बोध होते. परंतु सखोल अभ्यास करता ही लिपी व्यवस्थित वाचताही येवू शकते. नाडिपट्टींमधील मूळ लिपी ही ग्रंथलिपी असल्याबद्दल लिपीशास्त्राभ्यासकांचा काही वाद होणार नाही अशी खात्री वाटते.

ह्या प्रकारची लिपी केवळ नाडीपट्टींमध्येच आढळत नसून इतरत्रही आढळते. माझ्या पाहाण्यात हितोपदेश, सिद्धऔषधयोजना .. ग्रंथांची हस्तलिखिते आलेली आहेत, त्यातही अशाच प्रकारच्या लिपीचा उपयोग केला गेल्याचे दिसते.

6. असे असतांना हिला सरळसरळ ग्रंथलिपी म्हणतां कूटलिपी कां म्हणतांत? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रथमकूटलिपीह्या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक ठरते. ह्या लिपीलाकूटलिपीअसे मराठीभाषेमध्ये संबोधिले जाते आहे. (नाडिवाचक स्वत: त्याला कूट्टेळुत्तु असेही म्हणतात) मराठी शब्दाचा विचार करता एक गोष्ट अशी लक्षात येते की मराठीभाषेमध्येकूटम्हणजे चूर्ण किंवा कोडे किंवा संकेत. ह्यावरून कूटलिपी म्हणजे सांकेतिक लिपी असा अर्थ मराठीभाषेमध्ये लावला जातो आहे. परंतु ही लिपी सांकेतिक नक्कीच नाही. आपल्या येथील एका -तमिळ सदस्यालाही ह्या लिपीतील अक्षरे विशेष कष्ट घेता वाचता आलेली आहेत. तरीही ही लिपी कूट (सांकेतिक) असावी काय?

7. हे जाणून घेण्यासाठी आपल्यालाकूट्टेळुत्तुह्या शब्दाचा अर्थ जाणावा लागेल. ह्यासाठी लिपीशास्त्रातीलयुक्ताक्षरह्या संकल्पनेची उजळणी करावी. ’युक्ताक्षरहा संस्कृतभाषी शब्द आहे. मराठीभाषेमध्ये ह्या शब्दासजोडाक्षरम्हणतात. देवनागरी लिपी आणि इतर तीसदृश लिपींमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली गेली म्हणजे त्या अक्षरांतून नवीन युक्तचिह्नाक्षरे सिद्ध होतात. ही युक्तचिह्नाक्षरे बरीचशी मूळ अक्षरासारखी दिसणारी परंतु मूळ अक्षरापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी असतात. ह्या अक्षरांनाच सामान्यपणे युक्ताक्षरे असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ: श्री = श् + र् + = असे लिहिता, ’श्रीअसे लिहिले जाते. ’श्रीहे युक्ताक्षर होय. लिपीशास्त्राभ्यासकांचे एक आवडते उदाहरण द्यावयाचे झाल्यास, संस्कृत शब्दकार्त्स्न्यम्ह्याची रचना क् + + र् + त् + स् + न् + य् + + म् अशी असून, तोका र्त्स्न्य म्असा लिहिला जातो. ह्यातर्त्स्न्यहे युक्ताक्षर आहे.

नाडिग्रंथ-नाडिपट्टी आणि नाडिभविष्य ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? कारण नाडिग्रंथामध्ये जे तथाकथित भविष्यकथन लिखितस्वरूपामध्ये उपलब्ध आहे असे सांगितले जाते, ते तर तमिळभाषेमध्ये आहे. आणि तमिळभाषेमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही! तमिळ लिपीमध्ये अक्षरे एकास एक जोडून लिहिली जातच नाहीत, त्यामुळे युक्तचिह्नाक्षरे - थोडक्यात युक्ताक्षरे - सिद्ध होत नाहीत.

उदाहरण: वर दिलेलाकार्त्स्न्यम्हाच शब्द तमिळ लिपीमध्ये लिहायचा झाल्यास க் + ஆ + ர் + த் + ஸ் + ன் + ய் + அ + ம் (क् + + र् + त् + स् + न् + य् + + म्) अशी फोड असली तरीही तो கார்த்ஸ்ன்யம் असाच लिहिला जाईल. ह्याचे कारण असे, की आधुनिक तमिळ लिपीमध्ये युक्ताक्षरांची संकल्पना ही अस्तित्त्वातच नाही. अक्षरे एकास एक जोडून लिहिली जाता, एकासमोर एक लिहिली जातात. ज्या अक्षरांचा हलन्त उच्चार असेल, त्यांच्या डोक्यावर पुळ्ळि (बिन्दु) देऊन त्यांचे अपूर्णत्त्व स्पष्ट केले जाते.

ह्याच युक्ताक्षरांना तमिळभाषेतकूट्टेळुत्तुअसे म्हणतांत. (कूडऽ एळुदिनदुकूट्टेळुत्तु = एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे)

तमिळ लिपीमध्ये जोडाक्षरेच नसताना, कूट्टेळुत्तु हा शब्द नाडीग्रंथांच्या लेखनाबाबत का योजिला जातो आहे? ते लेखनदेखील ग्रंथलिपीमध्ये आहे, तर ह्या सर्व विषयाच्या संदर्भात युक्ताक्षरांची संकल्पना कशासाठी सांगितली जाते आहे? ह्याचे कारण असे की कूट्टेळुत्तु ह्या शब्दाचाजोडाक्षरेअसा एकमेव अर्थ नसून एकत्रितरीतिने लिहिणे / सोबत लिहिणे / एकसारखे लिहिणे असाही अर्थ होतो. नाडीग्रंथांच्या लेखनाबाबतीत बोलावयाचे झाल्यास ह्यातील ग्रंथलिपी ही बरीचशी मोडी लिपीसारखी हात उचलता लिहिण्याच्या शैलीमध्ये (पक्षी : एकत्रितरीतिने, सोबत लिहिलेली, एकसारखी अशी) असल्यामुळेकूट्टेळुत्तुअसा शब्द तिच्याबाबतीत उपयोजिला जातो. ती लिपी सांकेतिक आहे म्हणून नव्हे!

8. तात्पर्य : ’कूडऽ एळुदिनदुम्हणजे एकत्रितरीतिने लिहिले गेलेले असे हे लेखन. हे लेखन ग्रंथलिपीमध्ये ग्रथित करून ठेवलेले असते, म्हणून ग्रंथ हा शब्दनाडिग्रंथ.

माझ्या अभ्यासावरून मी हे खात्रीने सांगू शकतो की नाडिपट्टींमधील लेखनाप्रमाणे लेखन करावयाचे झाल्यास सदर मनुष्यास लिपीशास्त्राचा सखोल अभ्यास आणि अनेक वर्षांचा सराव केल्याखेरीज शक्य नाही. खरे पाहता ह्या विषयावर नव्या दृष्टीकोनातून अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे, परंतु आपल्याकडील अनेक तथाकथित पुरोगामी लोकांचा उत्साहज्योतिषकिंवाभविष्यहे शब्द ऐकूनच ढेपाळतो आणि केवळ अभ्यासाच्या अभावामुळे विषयाकडे दुर्लक्ष होते आहे हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.