Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

रविवार, ३ मे, २०१५

भृगूसंहितेच्या शोधात... भाग 1 नेपाळ व उत्तर भारत यात्रेचा संक्षिप्त अहवाल

a


भृगूसंहितेच्या शोधात... भाग 1

नेपाळ व उत्तर भारत यात्रेचा संक्षिप्त अहवाल

सादरकर्ताः विवेक चौधरी.

जीवावर उदार होऊन अनेक संकटांना तोंड देत समुद्रसफरीवर निघालेल्या सिंदबादच्या सुरस कथा आपण बालपणी वाचल्या व ऐकल्या असतील. जीव घेणा नसला तरी असाच अदभूत घटनाक्रमात घडत गेलेला प्रत्यक्ष शोध प्रवास आपल्यासाठी सादर.
नेपाळमधील काठमांडू विमानतळावर उतरल्यावर जायचे कुठे व भेटायचे कुणाला अशा साध्या प्रश्नांचे उत्तर ठाऊक नसलेल्या प्रवासात मी, जळगावचा नाडीग्रंथ प्रेमी - विवेक चौधरी, ओक सरांच्या सोबत या यात्रेला निघालो. दि 23 मार्चला पालम विमानतळावरून आमचे उड्डाण झाले. ‘काठमांडौ’ (नेपाळी लोकांचा उच्चार) त्रिभुवन विमानतळावर उतरल्यावर एका टॅक्सीवाल्याच्या मोबाईलवरून सानू थापा यांच्याशी संपर्क साधला. पर्यटकांना घ्यायला आलेल्या गर्दीतून हात वर करून त्या ओळख देत भेटल्या अन् आमच्या नेपाळ यात्रेतील प्रथम अदभूताची सुरवात झाली.
निघायच्या अगदी 1-2 दिवस आधी गोव्यातील सनातन संस्थेतर्फे ओक सरांना नेपाळमधील त्यांच्या साधिकेशी संपर्क करायला सुचवले गेले. त्यांचा सनातनशी पेपर वाचण्याइतपत संबंध. पण सानू थापा या तरुण मुलगीवजा साधिकेच्या रुपाने महर्षींच्या मदतीचा हात दैवी संकेत होता. कारण त्यांनी पुढील संपूर्ण 3-4 दिवसाच्या कार्यक्रमांचे आयोजन व पूर्तता केली. त्यातील काही ठळक घटनांचा परामर्श...
रेडिओ जॉकी जनार्दन घिमिरे
‘हे कांतीपुरा 93.1 एफ एम रेडिओ स्टेशन आहे’ असे म्हणत ‘रेडिओ जॉकी’ जनार्दन घिमिरे यांनी ओकसरांशी हिन्दीतून बोलत नेपाळीभाषेत पहाटे 4 ला उठून टॅक्सीने वाटेत सानु थापांना घेत स्टूडिओत पोहोचून दिलेली मुलाखत घेतली. एव्हरेस्टच्या शिखरापासून ते चीन सरहदीपर्यंतच्या संपुर्ण नेपाळच्या दऱ्याखोऱ्यात ती पोहोचली! सुरवातीला ओक सरांनी तमिळनाडूमधील नाडी ग्रंथांची तोंड ओळख करून दिली. नंतर मुलाखतीत ओकसर कोण, ते नेपाळमधे भृगूसंहितेच्या ग्रंथ संपदेचा ठावठिकाणा शोधायला का आलेत, आपल्यापैकी कोणाकडे असे प्राचीन ग्रंथ असतील तर त्याची माहिती मला म्हणजे रेडिओ जॉकी घिमिरेंना दयावी. ते ती ओकांना पोहोचवतील असे नेपाळी भाषेत तीन-तीनवेळा आवर्जून आवाहन केले गेले.
नेपाळच्या संस्कृतीचा तो एक मोठा साठा आहे. नेपाळच्या भूमीतून आमच्यापुर्वजांकडे भृगुसंहितेचे ग्रंथ आले असे भारतातील भृगुशास्त्री अभिमानाने सांगतात तेंव्हा असे प्राचीन ग्रंथ साहित्य योग्य व्यक्तींच्या हाती सोपवून त्यातील ज्ञानाचा लाभ जगातील सुयोग्य व्यक्तिना मिळावा अशी त्यांची तळमळ आहे. अशी त्यांची घोषणा लोकांच्या कानावर गेल्याचे आम्हाला नंतरच्या काही कार्यक्रमातील व्यक्तिनी जनार्दन घिमिऱ्यांबरोबरची मुलाखत आम्ही ऐकली म्हटल्याने ओक सरांच्या मुलाखतीचा योग्य तो परिणाम झाल्याची खात्री वाटली. नेपाळ मधील सुदूर खेड्यापाड्यातील लोकांच्या प्रत्यक्ष भेटीस जाऊन जे सहजासहजी साध्य झाले नसते ते एका ‘मन की बात’ मुलाखतीतून सहजी घडून आले!
डॉ. माधव भट्टराय 
सानू थापांनी नेपाळनरेनशांचे राज ज्योतिषी म्हणून नावाजले गेलेले डॉ. माधव भट्टराय (भट्टाराय असे सामान्य उच्चारण) यांच्याशी संपर्क करून त्यांच्या घरी भेटायची वेळ मिळवली होती. ओकसरांनी त्यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव केला. नंतर अचानक जमलेल्या मित्रपरिवारात चर्चा होऊन दुसऱ्या दिवशी एक ज्योतिषांची सभा घ्यायचे ठरले. ती सभा नंतर डॉ. लोकराज पौडेलांच्या पुढाकाराने यांच्या संस्थेत 38 ज्योतिषांच्या समोर पार पडली. त्यात एक-दोघांनी आमच्या पुर्वजांकडील काही पोथ्या अजून उपेक्षित आहेत त्या उघडून शोध घेऊन आपणाला डॉ. माधवजींच्या मार्फत आपणास कळवतो असे आवर्जून सांगितले.
डॉ. गोविंदशरण उपाध्याय
काठमांडोतील त्रिचंद्र कॉलेजचे प्रोफेसरांशी सानू थापांनी ओळख करून दिली. त्यांची भेट घेतल्यावर, ‘चला, मी तुम्हाला राष्ट्रीय आर्काईव्ह मधे नेतो. तिथेच तुम्हाला हवे ते महत्वाचे दस्ताऐवज आहेत’ असे म्हणत आधी ओक सरांना व नंतर मला आपल्या बाईकवरून खेप मारत नेले! त्यांच्या धडाका असा होता की आर्काईव्हच्या स्टाफच्या ताब्यातील सर्व कॅटलॉग (जो स्टाफ अन्यथा कोणालाही साधा चिठोरा देखील हाताळायला देण्याची परवानगी काढायला दाद देत नाही) त्यांनी स्वतः पाशी घेतले. ‘नेपाळात जे मॅन्यूस्क्रिप्ट्स आहेत ते इथे जर्मनी लोकांच्या सहाय्याने मायक्रोफिल्मिंग करून जतन केले आहेत. तुम्ही जे शोधता आहात ते यात जर नसतील तर मग कुठेच मिळणार नाहीत! असे म्हणत, पहिला ज्योतिषखंड ओक सरांच्या हातात देत, ‘शोधा, तोवर मी आपल्या सहकाऱ्याला गाडीवर घालून आणतो म्हणत माझ्यासाठी ते परतले! तोवर ओक सरांनी 10 जाडजूड रजिष्टरवजा कॅटलॉगची सुक्ष्म पहाणी संपवून, ‘विवेक, तुला उपयोगी हे-हे रजिस्टर नंबर पहा’ म्हणून माझी सोय केली! आयुर्वेदातील काही संहितांमधे माझा विशेष रस सरांना माहित होता. असो. आम्ही पटापट त्या कॅटलॉगमधून हव्या त्या पानांचे फोटो घेतले व नंतर सानू थापांनी त्या पानांच्या मायक्रो फिल्म्स पाहून त्यांची झेरॉक्स मिळवायला नेपाळी रुपयात पैसे भरून ते मिळवायची व्यवस्था करायची सोय केली. आम्ही परतल्यावर काही दस्तऐवज मिळवायची प्रक्रिया आता सुरू आहे.
नेपाळ एम्बसीतील अधिकारी अभय सिंग 
ओक सरांनी नेटवरून काही माहिती मिळवून डॉ. विजय भटकर सरांच्या सहीचे एक पत्र व एक्सटर्नल मिनिस्ट्रीतर्फे सांस्कृतिक आदान प्रदान करायला उत्तेजन करणारी ICCR (Indian Council for Cultural relations) नवी दिल्लीला पत्रव्यवहार केला होता. त्या कौन्सिलचे अध्यक्ष डॉ लोकेश चंद्रा यांच्या फाईलनोटींगमुळे ओक सरांना आम्ही काठमांडौत असताना निदान एक विपत्र आले की ‘आम्ही काही मदत करू शकत नाही’! तरीही ओक सरांनी एम्बसीतील अभयसिंग नामक अधिकाऱ्याचा असा पिच्छा पुरवला की विचारू नका! आपल्या नेपाळमधील भारत वाचनालयात आपण नाडी ग्रंथ विषयावर पुस्तके ठेवावीत म्हणजे भारतीयांच्या ज्ञानाची ओळख नेपाळी अभ्यासकांना होईल. याचा परिणाम म्हणजे ओकसरांच्या पुस्तकांच्या प्रती पाहून व सरांनी त्यांना तिथल्या तिथे दिलेल्या अर्जावर, ‘मी ही पुस्तके जगातील सर्व भारतीय वाचनालयासाठी उपलब्ध करून द्यावीत असा उचित शेरामारून दिल्लीला आमच्या खात्याला कळवीन’ म्हणून आश्वासन दिले व वर चहा पाजला. पुर्वी गावात पाव्हण्याला आल्याआल्या पाणी व गुळाच्या खड्यानी स्वागत करायची पद्धत असे तसे काहीसे अभयसिंहाच्या टेबलावरील चवदार गुळाच्या तुकड्यांनी व थंडगार पाण्याने केले. मात्र एम्बसीच्या रस्त्याचे काम चालू असल्याने त्यांच्या ऑफिसला पोहोचायला पायी चालत जायचा जो द्राविडी प्राणायाम करायला लागला त्यामुळेही ही भेट लक्षात राहिली!
मेरठ मधील बिपिन दीक्षित
ज्यांनी शांताराम आठवल्यांचे ‘नाडी ग्रंथ - एक अभ्यास’ पुस्तक वाचले असेल त्यांना एस के उर्फ शिवकुमार दीक्षितांचे मुंबईच्या आलीशान अस्टोरिया हॉटेलातील वाचनाचे किस्से आठवत असतील. 1966 साली मुबईत जुलै उजाडला तरी पावसाचे आगमन लांबल्याने रेडिओवर मुख्यमंत्र्यानी लोकांना मुंबई सोडायचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर, ‘आज पासून इतका पाऊस सुरू होईल की लोक आता पुरे म्हणायला लागतील’ असे भृगूमहर्षींनी केलेल भाकीत, खिशात फक्त 5 रुपये 12 आणे वगैरे वगैरे...त्यापैकी काही.
तर या दीक्षितांचे नातू आजकाल मेरठमधे भृगूसंहिता केद्र (447 बुढाना गेट, हनुमान मंदिरासमोर, मो. क्र. 9837066263) चालवतात. आम्ही त्यांची आई, पत्नी व मुलासमावेत त्यांचा शाल व भृगुमहर्षींच्या गुरूकुलाचे एक रंगीत चित्र भेट देऊन सत्कार केला. त्यांच्या कडील राशी इष्टकाल मिलान यंत्र, गर्ग संहिता, भृगु संहितेच्या तमिलनाडी प्रमाणे ताडपट्ट्यावरील पाली लिपीतील कथन आदी वर चर्चा करायची संधी ओकसरांमुळे मला मिळाली. मी माझी कुंडली त्यांच्याकडे शोधायला दिली आहे. माझे भृगूफल सापडल्यावर ते केंव्हा बोलावतील याची उत्सुकता आहे.
प्रतापगढच्या भृगु केंद्रांच्या भेटी
अलाहाबाद पासून 50 किमीवर प्रतापगढ या गावात होशियारपुरातील (टूटोमाज़रावाले) भृगुशास्त्रींप्रमाणे (गांव संडारीवाले) चार भृगु संहितावाचकांची घरे रेल्वे स्टेशनपासून चालत जायच्या अंतरावर आहेत. पैकी श्रीमती अनीता प्रकाश (त्रिपाठी) मो. क्र. ( ), श्रीमती साधना सुर्या (मो. 9450185962) व डॉ. बिपिन मिश्र (मो क्र. )या तीन जणांची भेट व सत्कार झाला. त्या प्रत्येकाकडील पट्ट्यांचे वाचन व मुलाखती टेप व व्हीडिओत सामावल्या आहेत. तेथील केंद्रात पातळ कागदासमान पट्ट्यावर पाली लिपीत भविष्य कथन आहे. त्याचा मासला ही ऐकायला मिळाला. साधारण 2000रुपये लागतात. शिवाय पट्टी हुडकायला काही मेहनताना घेतला जातो. पण 3-4 आठवड्यात कुंडली मिळते असा दावा केला जातो.
मित्रांनो, हा होता भुगुसंहितेच्या शोधाचा धावता वृतांत. या शिवाय यात्रेत अनेकदा न ठरवता भेटणारे मिळाले. त्यात होते काठमांडौतील मराठी कुटुंबिय जगन्नाथ करमरकर, विदुषी डॉ सरस्वतीसिंह व कल्पना परांजली. मेरठच्या केंद्रात मिळालेले राशी मिलान यंत्र, लखनौला अचानक नाडीकेंद्रात जाऊन तेथील चालकांनी नाडीपट्टीतील नावांचा व जन्म दिनांकाचा घेतलेला व्हीडिओ, आयत्या वेळी कॅन्सल झालेली रेल्वे, बस, रिक्षातून धक्केखात जाताना, शरयूतीरावरील गचडीच्या गर्दीतून, टॅक्सी, प्रवासात, नंतर विविध ठिकाणी हॉटेलातील (गैर)सोयी व अयोध्येत सीआरपीएफ मधील माझ्या जुजबी ओखळीच्या मित्राने करून दिलेली राहायची सोय व रामजन्मभूमीच्या लांबलचक रांगेतून केलेली सुटका, अशा अनेक वेळी अनपेक्षितपणे मिळून आलेली मदत, पशुपतीनाथाच्या मंदिरात अचानक आदिशंकराचार्यांची हस्तमुद्रेसह संस्कृतमधे घडलेले ऑटोरायटींग, अशा घटनांची मालिका आम्हाला अनेकदा महर्षींच्या कृपाआशीर्वादाची आठवण करून देत होत्या.
1
1. पहाटे 5.30च्या कार्यक्रमासाठी जनार्दन घिमिरें सोबत स्टूडिओत ओक सर
---
2
2. डॉ माधव भट्टरायांचा शाल घालून सत्कार करताना
---
3
3 डॉ . गोपाल शरण उपाध्यायांसोबत
4
4. काठमांडौ आर्काईव्ह भवनातील शीलालेख
----
5
5. भारत पुस्तकालयाचा दर्शनी भाग
6
6. मदन पुस्तकालयासमोर ओक, विवेक चौधरी
7
7. पशुपतीनाथ मंदिराचा दर्शनी भाग
8
8. पशुपतीनाथाच्या मंदिरात घडलेले ऑटोरायटिंग - आदिशंकराचार्यांचा संस्कृतमधील संदेश भाग 1.
मेरठ, अयोध्या, प्रतापगढ, प्रयाग प्रवासातील फोटो नंतर पुढील भागात सादर करीन...

मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

पुस्तक परिचय -
 बोध अंधश्रद्धेचा
अर्थात नाडी भविष्यानी केला अंनिसचा पराभव!
लेखन व संकलन 
विंग कमांडर शशिकांत ओक (नि)

 ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ही एक सर्कस आहे. त्यात विविध तऱ्हेचे अंधश्रद्धेच्या विरुद्ध खेळ खेळले जातात व सभोवताली जमलेल्यांचे त्याद्वारे मनोरंजन केले जाते. अर्थातच अंनिससर्कस मधील खेळाडू विविध (मखलाशीपूर्ण) कसरती करण्यता तरबेज असतात. नंतर हुकमी टाळ्या मिळवण्याच्या तंत्रात अत्यंत प्रवीण असतात.
सर्कसचे सर्वात मोठे आकर्षण हे त्यांचा ‘जनावरखाना’ असून त्यांना रिंगणात आणून हातातील जबरदस्त आसूडाद्वारे सर्व हिंस्त्र व क्रूर श्वापदांना आपल्या हुकुमावर नाचवायचे जोखमीचे व दिमाखाचे काम त्या सर्कसचा कार्यवाह – “रिंगमास्टर” करतो. या रोलमधे आपण स्वतः रिंगणात हजेरी लावता व आसूडाच्या व काठीच्या दरडावणीने अवघड व जीवघेण्या कवायती लीलया करवून टाळ्या मिळवता. आत्ता पर्यंतचा हा आपला अनुभव असल्याने आणि आपणच या सर्कसचे रिंमास्टर असल्याने, ‘माझा रिंगणात या, मग मी तुम्हाला कसे लोळवतो ते पहा’ असा आपला पवित्रा तुमच्या दृष्टीने शास्त्रीयपायावर आधारित पण भविष्यकाळात कसेही करून अंग काढून पसार होण्यास सोईचा आहे.
तथापि ‘नाडी भविष्य’ हा काही तुमच्या पिंजऱ्यात बाळगलेला सिंह नाही. त्यामुळे त्याने ‘गपगुमान’ तुम्ही रचलेल्या रिंगणात यावे व चुपचाप तुमच्या तालावर नाचावे असे स्वप्न बाळगून असाल तर ती आपली घोर चूक आहे.
या इथे ‘नाडी भविष्यकर्ते महर्षी’ हे “रिंगमास्टर” आहेत. भविष्याच्या आसूडाला तो ‘थोतांड’ म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात. वर्तमानपत्रातून परिपत्रके व लेख लिहून व मला मधे घालून, ‘पहा या रिंग मास्टरची कशी ऐशी की तैशी करतो. नाहीतर 5 लाख देतो’ असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी करता. या सर्व परिस्थिती मी रिंगणात कसा? नाडीकेंद्रे जेथे आहेत तेथे कूटलिपी वाचणारे उपलब्ध आहेत. अशा विविध केंद्रांना भेटून एकच पट्टी विविध नाडीवाचकांनाकडून वाचवून घेऊन त्यातील मजकुरातील सत्यता, अर्थवत्तता अचूक व तात्काळ काढता येते. हे आपणांस चांगलेच ठाऊक आहे. एरव्ही मीच रिंग मास्टर, माझीच सर्कस, माझेच रिंगण आणि माझेच टाळ्या पिटू प्रेक्षक याच कूपात राहून मग शास्त्रीय संशोधनाचे नाटक कशाला?
याचे साधे कारण हे की नाडी केंद्रास भेट देण्यास यायचे नाही व अंनिसचे तोंडकाळे करून घ्यायचे नाही. आपल्या अंनिस सर्कसचे चालायचे दिवस आता फार जिकिरीचे झाले आहेत. प्रवीण कसरतपटू शिष्यगण आपणांस सोडून गेले आहेत. इतर शिलेदारांनाही आपल्या आसुडाचा बेगडीपणा लक्षांत आला आहे. वर्तमानपत्रवाले एकजात आपल्या विविध क्लुप्त्यांना आपल्या मागे कुत्सितपणे हसून नावे ठेवतात, मात्र तोंडावर व वर्तमानपत्रातून नावे ठेवायला आपल्या सर्कसचा दरारा मोठा असल्याने टाळतात. पण जे आपल्या कल्पनाविश्वात तल्लीन असतात अशा आपणांस हे लक्षात आलेले नाही.

मित्रांनो, 
कदाचित आपण वरील शीर्षका व मजकुरावरून अंनिस विरुद्ध मुद्दाम रचलेले काहीतरी कुभांड असावे असे समजलात तर नवल नाही. कारण अख्ख्या भारतात अंनिसचा दबदबा व  सन्मान बराच मोठा आहे.
ओकांना त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर वाटत होता. परंतु नाडीग्रंथ भविष्याच्या संदर्भात त्यांच्याशी झालेल्या संपर्कावरून त्यांचे मत बदलायला लागले. ते कसे व का याचा आपणास शोध घ्यायचाअसेल तर हे पुस्तक वाचा.
 ओक म्हणतात, अंनिसची हेतुपु्र्वक बदनामी मला करायची नाही. माझा तो अधिकारही नाही. पण त्यांच्या कार्यप्रणालीतील त्रुटी व खोटेपणा, रेटून आपलेच खरे म्हणून मांडण्यामागील आंधळा बुद्धिवाद  या गोष्टी मला खटकत होत्या.'
'पंरंतु अशा प्रथितयश समाजाभिमुख असल्याचे भासवणाऱ्या समितीच्या खोटेपणाला  उघड करून दाखवणारे कोण असेल का?' असे त्यांना वाटत असता ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉ विजय बेडेकरांशी झालेल्या चर्चेत त्यांनी नाडी ग्रंथांच्या संदर्भातील  अंनिसचा बुद्धिवादी तर्क कसा तोकडा आहे हे त्यांना माहित असूनही  पु्र्वग्रहांमुळे  तो सोडणे त्यांनाअशक्य झाल्याने त्यांची कशी फरकट होते याचे विदारक चित्र पदर दर पदर सांगितले जावे. भविष्य काळात अंनिस वाल्यांशी झालेला आपला प्रदीर्घ पत्रव्यवहार एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जपला जावा असे वाटून  ड़ॉ. विजय बेडेकरांनी आपणहून माझ्या जवळील सर्व पत्रव्यवहार मागवून पुस्तक रूपात प्रकाशित करून सादर केला आहे.'
'पुरावा द्या तर मानू' असे साधारणपणे बुद्धिवादी लोकांचे म्हणणे असते नव्हे, तसा आग्रह असतो. देव, भुते, ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम वगैरे बाबतीत ते नेहमी पुराव्यासाठी अडून बसतात व तो नसल्याने मोठ्या रकमेची आव्हाने देत 'आम्ही जिंकलो' असे वेळोवेळी प्रसिद्धिमाध्यमातून जाहीर करताना आपण वाचले असेल. मात्र हीच अंनिस जेंव्हा नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यातील नावांचा पुरावा  सादर  केला की त्याच्याकडे सोईस्करपणे काणाडोळा करून जणू काही तो पुरावा नाहीच असे मानून 'आपल्याकडून माहिती काढून तीच नाडी पट्टीतून सांगितली जात असते'  ही एकच आणि एक रेकॉर्ड लावून आपला एक साथीदार कसा गेला व त्याने नाडीचा भांडाफोड कसा केला याचे सुरस वर्णन करण्यात मश्गूल होते. अशा व्यक्तींनी केलेला भांडाफोड किती व  कशी तकलादू आहे असे साधार दाखवून देखील त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष करायची मखलाशी अंनिस रीतसर करते तेंव्हा त्यांचा बुद्धिवादी पायाच निखळून पडतो.   
नाडीग्रंथांच्या पट्ट्यातील मजकुराचे  पुरावे स्वतः अनुभव घेऊन सादर न करता,  'आम्ही  देऊ त्या अंगठ्यांच्या ठशांचे नाडी भविष्य ओकांनी शोधून काढावे' असा हट्ट मुद्दाम ओकांना घोळात घेऊन, 'ओक सहकार्य करायला कुचराई करतायत' असा मुद्दाम बहाणा करायचे तंत्र अंनिसचे कार्यवाह स्वतःच्या हाताने लिहिलेल्या पत्रातून करताना दिसत असतात, 'अंनिसला जर नाडी ग्रंथांना खोटे ठरवायचे असेल तर  ओकांना मधे पाडायचे कारण काय? उलट ओकांना आपण खबरदारीपु्र्वक दूर ठेवायला पाहिजे' असे खणकून म्हटले गेले. कारण  अंगठ्याचे ठसे त्यांना पाठवून त्यांच्याकडून नाडीपट्ट्या शोधायला भाग पाडून 'नाडी भविष्य खरे ठरवण्यात ओकांचा हात होता' असा कांगावा करायचा असे त्यांच्या चालीवरून कोणालाही सहज लक्षात येईल. ओक अशा सापळ्यात अडकत नाही असे पाहून ओकांची व्यक्तिगत बदनामी करायला काही अंनिस प्रेमींनी सुरवात केली होती. परंतु ओकांच्या खमक्या भूमिकेमुळे त्यांना ते ही करता आले नाही. दै पुढारीतून आलेल्या त्यांच्या लेखांना लक्ष्य करून डॉ जयंत नारळीकरांची साक्ष काढून  खोटे ठरवणारे लांबलचक  लेख छापले गेले, मात्र ओकांची बाजू मांडायच्या वेळी अन्य महत्वाचा मजकूर असल्याने दुर्लक्ष करून टाळले जाणे व त्रोटकपणे ते सादर करताना दिशाभूल होईल असे संपादन करणे अशा मखलाशा पहायला मिळाल्यावर अंनिसचा पर्दाफाश करायला हवा असे ओकांना वाटणे साहजिक आहे. नाडी ग्रंथासाठी पुण्यातील मा.स. रिसबुड व प्रकाश घाटपांडे यांनी पुढाकार घेतला होता. विेशेषतः त्यांनी अद्वयानंद गळतगे यांच्याशी उभा दावा मांडला होता.  त्यांनी कानडीतून पोस्टकार्डाद्वारे हीन शब्दात नालस्ती करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तो  सर्व भाग 'विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन'  या प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या पुस्तकात सविस्तरपणे दर्शवला गेला आहे. 'आम्ही म्हणतो ना की नाडी भविष्य हे थोतांड आहे मग ते आहे' असे प्रत्यक्ष तपासणी न करताच अंनिसवाले जाहीर करतात तेंव्हा त्यांच्या विज्ञानवादाच्या खोट्या बुरख्याला फाडायची गरज वाटते.
नेमके तेच काम या पुस्तकाने केले आहे.
पुस्तकाच्या मोजक्या  प्रती बुकगंगा. कॉम वर उपलब्ध.
किंमत 250  पाने 260.